शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था

By admin | Published: January 23, 2015 2:02 AM

आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था

नाशिक : भारताच्या प्राचीन वेदात असलेल्या आयुर्वेदाच्या परंपरेला देशात आणि जगभरात पोहोचविण्यासाठी केंद्रशासन प्रयत्न करीत आहे. अ‍ॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था उभारण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पहिले आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.पंचवटीतील आरोग्य सेवा संघाच्या आरोग्य शाळा रुग्णालयाच्या वतीने पंचकर्म कक्षाचे उद््घाटन श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, संघाचे अध्यक्ष मामासाहेब राजपाठक तसेच अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.ऋषी-मुनी आणि वेदांत सांगितलेले आयुर्वेद ही आपली परंपरा आहे. परंतु परकियांनी आक्रमण करून अन्य परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तद्वतच स्वातंत्र्यानंतर या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता केंद्र सरकारने आपली परंपरा असलेले आयुर्वेद पुढे नेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे केंद्रात प्रथमच हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाच्या विविध योजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरीव तरतूद करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आयुर्वेदाच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सांगून नाईक यांनी आयुर्वेद आपल्या देशातील असतानादेखील विदेशी लोक त्याचे महत्त्व सांगतात. नाकर्तेपणामुळे उगम असलेल्या देशातच आयुर्वेदाचे महत्त्व कमी झाले आहे. आयुर्वेद टिकवून ठेवण्यासाठी देशातच आयुर्वेदाचे महत्त्व वाढले पाहिजे. अ‍ॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी केंद्र, राज्य आणि ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्वरोगोपचार मिळू शकेल तसेच औषध निर्मितीतून गरिबांना परवडणारी उपचार व्यवस्था निर्माण होऊ शकेल, असेही नाईक म्हणाले.