शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बदलीचा ठराव करताच ग्रामसेवकाने ठोकली धूम, ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 17:29 IST

नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील प्रकार

बाबासाहेब गोसावी,  

विल्होळी (ता ). नाशिक-  प्रजासत्ताक दिन म्हणजे थेट जनतेचा कारभार मात्र याच दिवशी नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील ग्रामस्थांना मात्र वेगळाच अनुभव आला. ग्रामसभेत दुरुत्तरे देणाऱ्या ग्रामसेवकामुळे ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी ग्राम सेवकाच्या बदलीचा ठराव केला. त्यानंतर हा आधिकार तुमचा नाही तर शासनाचा आहे असं सांगत ग्रामसेवक सभेतून निघून ग्राम पंचायत कार्यालयात जाऊन बसल्याने ग्रामस्थांनी त्याच्या बदली साठी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. अखेरीस विस्तार अधिकाऱ्यांना या वादग्रस्त ग्रामसेवकाची तातडीने उचलबांगडी करावी असे निवेदन देण्यात आले.

विल्होळी येथील हनुमान मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रथम नागरिक सरपंच जानकाबाई चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध विकास कामे करण्याचे ठराव करून समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विल्होळी चुंचाळे रस्ता, कुसुमाग्रज नगर सभा मंडप, वाडी वस्त्यांवरील पाणीपुरवठा, बजरंगवाडी टेकडी लेवल, संघर्ष नगर पाणीपुरवठा अशा समस्या मांडल्या असता त्यावर ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात येत नव्हते. ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना हा अधिकार  माझा नसून सरपंच व ग्रामसभेचे अध्यक्ष यांचा आहे. अशी अरेरावीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी एकमताने ग्रामविकास अधिकारी यांची त्वरित बदली करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. नंतर सभा तहकूब न करता ग्रामविकास अधिकाऱ्याने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पलायन केले ग्रामस्थांनी विचारणा केली. ग्रामसभेमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांचा बदली करण्याचा कोणताही अधिकार नाही, तो अधिकार वरिष्ठ पातळीवरील आहे. असे सांगितले . त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत  ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच ग्रामसेवकाची बदली करण्यासाठी निवेदन तयार करून ते विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे व श्रीधर सानप यांना देण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक