शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

शेतकऱ्यांची पीकविमा भरण्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:11 AM

निसर्गावर आधारित असलेली आपली शेती शेतकऱ्यांनी आधारभूत शेती म्हणूनच व्यवसायात स्वीकारली आहे. त्यासाठी निसर्गात होणारे बदल, यामुळे अतिवृष्टी अवर्षण ...

निसर्गावर आधारित असलेली आपली शेती शेतकऱ्यांनी आधारभूत शेती म्हणूनच व्यवसायात स्वीकारली आहे. त्यासाठी निसर्गात होणारे बदल, यामुळे अतिवृष्टी अवर्षण दरवर्षीचे ठरलेले आहे. पिकाची नुकसान होतच असल्याने, त्याच्यावर पर्याय म्हणून शेतकरी दरवर्षी पीकविमा करण्यासाठी सरसावले होते. मात्र, गतवर्षी शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीकविमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी मोठ्या आशेने आपले नुकसान झालेल्या पिकाचा विमा करून घेतो. सदर विमा हा शेतकऱ्यांनी केलेला असतो. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळे शासकीय अनुदान प्राप्त होऊनही पीक नुकसान विमा कंपनी ग्राह्य धरत नाही. पीकविमा मिळत नसल्याने, शेतकरी या वर्षी विमा करून घेण्यासाठी तयारीत नसल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना पीक नुकसान झाले असतानाही, विमा कंपनीने लावून दिलेली वेगळे निकष सर्व शेतकऱ्यांना शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी आपली तक्रार पीकविमा कंपनीपर्यंत पोहोचण्यास विलंब केला होता. यामुळे पीकविमा कंपनीने त्यांच्या मुदतीत आलेल्या तक्रारींचे निवारण करून, शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई दिली होती. या दृष्टीने प्रत्येक गावातील नऊ ते दहा लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला होता. पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान घोषित केले होते. त्यापैकी शेतकऱ्यांना दर हेक्‍टरी २० ते २५ हजार रुपयांचे अनुदानही प्राप्त झाले. मात्र, हे नुकसान सार्वजनिक लक्षात घेऊन विमा कंपनीने पीकविम्याचे निकष मागे न घेता, शेतकऱ्यांना वेगळेच निकष लावून विमा प्राप्त करून घेण्यासाठी भाग पाडले. ही व्यवस्था पुढील काळात होऊ नये, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना योग्य ती माहिती वेळेवर देऊन, तक्रार करण्यासाठी भ्रमणध्वनी सज्ञानता याचे मार्गदर्शन करावे, असे बोलले जात आहे.