शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

भाम धरणाला गळती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 6:05 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाजवळ भाम नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या भाम धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागल्याने पुनर्वसितात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथकाने या गळतीची पाहणी करून गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे भाम धरण बांधण्यात आले आहे. या धरणात यावर्षी पूर्णपणे पाणीसाठा करण्यात आल्याने हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र या धरणाच्या मुख्य सांडव्याच्या अंतर्भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने हे पाणी सिमेंटच्या सांडव्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात साचत असल्याने हे पाणी विजेच्या मोटारीने बाहेर काढण्यात येत आहे. दरम्यान या गळतीची माहिती स्थानिक नागरिकांनी घोटी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये यासाठी कर्मचारी गणेश सोनवणे, रविराज जगताप आदींच्या पथकासह धरणाच्या गळतीची पाहणी केली .या गळतीमुळे भविष्यात धरणाच्या खाली पुनर्वसन केलेल्या नागरिकांना धोका निर्माण होणार नाही यासाठी गळती रोखा अशा सूचना केल्या आहेत.इन्फो...सांडव्याच्या पोकळीत साठते पाणीपंतप्रधान सिंचन योजनेतून तयार झालेले लेडीज टीएमसी क्षमतेच्या या धरणात आरंभीच्या काळात धरणाची क्षमता पाहण्यासाठी निम्म्याहून कमी पाण्याचा साठा करणे गरजेचे होते.मात्र शासनाने पहिल्याच वर्षी पूर्णपणे साठा केल्याने धरणाला गळती होईल याची कल्पना प्रशासनाला आली नाही.परिणामी मुख्य सांडव्याच्या अंतर्भागात असलेल्या पोकळीत मोठ्या प्रमाणात गळतीमुळे पाणी साचत असल्याने हे पाणी नियमित काढले नाही तर हा सिमेंटचा कालवा पाण्याच्या दाबामुळे फुटून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान हे पाणी काढण्यासाठी दोन विजेचे पंप बसविले असून या पंपाद्वारे अखंडपणे पाणी बाहेर काढण्यात येत आहे.पुनर्वसितात भीतीचे सावटदरम्यान या धरणाच्या कामासाठी बुडीत क्षेत्रात गेलेल्या भरवज, निरपण या गावासह काळूस्ते गावाच्या दरेवाडी, सारु कतेवाडी, बोरवाडी या गावाचे पुनर्वसन धरणाच्या बांधाखाली केले आहे.भविष्यात ही गळती चालूच राहिली तर सर्वाधिक फटका या पुनर्वसित गावांना बसणार असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

टॅग्स :Damधरण