शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

कांद्याच्या प्रश्नावर विरोधक दुतोंडी - भारती पवार

By श्याम बागुल | Updated: August 22, 2023 16:14 IST

कांदा प्रश्नावरून जिल्ह्यातील बाजार समित्यांनी दुसऱ्या दिवशीही केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे.

नाशिक : सध्या उपलब्ध असलेला व भविष्यात लागणाऱ्या कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळावेत यासाठी कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात आल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करीत आराेग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा व टोमॅटोच्या भाववाढीच्या प्रश्नावरून संसदेत सरकार विरोधी भूमिका घेणारा विरोधी पक्ष दुतोंडी असल्याची टीका केली आहे.

कांदा प्रश्नावरून जिल्ह्यातील बाजार समित्यांनी दुसऱ्या दिवशीही केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२२) डॉ. भारती पवार यांनी भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला आहे. निर्यात शुल्कात वाढ केली म्हणजे निर्यात बंदी केली असा नव्हे. या उलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून केंद्र सरकाने नाफेड मार्फत दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, हा कांदा २४१० रूपये क्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे.

निर्यात मुल्य कमी असतांना देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे यातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार असल्यामुळे याचा विचार शेतकऱ्यांनी करावा असे सांगून डॉ. पवार यांनी, टोमॅटोचे दरवाढ, कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा राहूल गांधी संसदेत उपस्थित करून सभात्याग करतात. आता मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला विक्रमी भाव मिळणार असतांनाही पुन्हा आंदोलनाची भाषा करीत असून हा त्यांचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही केली आहे.

टॅग्स :Bharati pawarभारती पवार