शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बळीराजा समाधानी : आॅगस्ट ते डिसेंबर महिन्यात सर्वाधिक आवक येवल्यात कांदा @ 3610

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:52 IST

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनदेखील भावात सतत तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यांपासून दिसत आहे.

ठळक मुद्देबळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया कांद्याची आवक तीनपट वाढली

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनदेखील भावात सतत तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यांपासून दिसत आहे.येवला बाजार आवारात शुक्रवारी (दि. ५) १४ हजार क्विंटल आवक झाली. त्यात ३६१० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. लगतच्या पाच राज्यांत अतिपावसाने थैमान घातल्याने कांदा पीक पुरते संपुष्टात आल्याने, देशांतर्गत कांद्याची गरज भागविण्याची जबाबदारी निसर्गानेच महाराष्ट्रावर टाकली आहे.कांद्याचे भाव रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. परंतु देशातील मागणी आणि पुरवठा यांचे समीकरण न जुळल्याने शेतकºयाच्या कांद्याला यंदा सलग पाच महिने चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया अखेर निसर्गानेच केली. येवला बाजार आवारात शुक्रवारी १४ हजार क्विंटल आवक झाली. त्यात ३६१० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. येवला गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये कांद्याची आवक तीनपट वाढली होती. एप्रिल महिन्यात दोन लाख ३० हजार क्विंटल आवक झाली. निरंतर आवकेत वाढच होत आहे. एप्रिलमध्ये सरासरी केवळ ३६० रुपये प्रतिक्विंटल भाव, तर मेमध्ये कांद्याचे बाजारभाव केवळ ३२५ रुपये प्रतिक्विंटल झाले. तुलनेत निम्म्याने भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकºयांना बुरे दिन पहावयास मिळाले होते आणि शेतकरी आगीतून फुफाट्यात पडला होता. परंतु आॅगस्ट २०१७ पासून कांद्याला चांगले दिवस आले. नाशिक, पुणे, नगर, सोलापूर या चार जिल्ह्यांतील कांदा संपूर्ण देशात कांद्याची गरज भागवण्यासाठी वापरला जात आहे. मध्य प्रदेशात कांदा गडगडल्याने तेथील राज्य शासनाने ८०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी केला. तोच कांदा शासनाने झळ खावून ३०० ते ३५० रुपयाने बाजारात आणला. हाच मध्य प्रदेशातील अतिरिक्त माल देशभर पोहचला. त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत कांद्याचे भाव स्थिर राहिले. १० जुलैला मध्य प्रदेश शासनाने हमीभावाची कांदा खरेदी बंद केली. शिवाय देशात, राजस्थान, गुजरात, आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात पुरामुळे कांदा पुरता नष्ट झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आणि कांद्याला चांगले दिवस आले.