शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

By प्रसाद गो.जोशी | Published: October 27, 2023 5:58 PM

राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे.

मालेगाव (नाशिक) : राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे - पाटील आंदोलन करीत आहेत. जरांगे- पाटील यांचे आंदोलन उभे राहिल्यानंतर धनगर, आदिवासी कोळी, ओबीसी समाजाला एकमेकांच्या विराेधात समोरासमोर उभे केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र भाजप सरकारकडून आखले जात आहे. आरएसएस संघटनेचा जातीयता, भांडणे वाढविणे, जाती - जातींमध्ये कलह निर्माण करणे, हा मुख्य अजेंडा असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मालेगाव तालुका दौऱ्यावर असताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. आंबेडकर म्हणाले की, हिंदू धर्मात वैदिक आणि संत परंपरा असे दोन भाग पडतात. त्यातील संतांच्या परंपरेवर चालणारा समाज माणुसकी व एकात्मता, एकमेकांचा मानसन्मान करण्यास शिकविते व वारीच्या माध्यमातून सहजीवनाचे दर्शन घडवून शांतीचा संदेश देणारा समाज आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणाराही समाज आहे. मनुस्मृतीवर आधारित असलेला वैदिक हिंदू समाज तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप डॉ. आंबेडकर यांनी केला. दिवाळीनंतर दंगली घडविण्याची शक्यताराज्यात असलेले शिंदे सरकार बरखास्त करून पुन्हा सत्तेवर यायचे आहे. त्यासाठी हिंदू - मुस्लीम व अन्य समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आतापासून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर गोध्रासारख्या दंगली देशात घडू शकतात. यासाठी जनतेने आतापासून सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर