शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

मुंढेंना रोखण्यासाठी भाजपाची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:48 AM

महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत विविध कामांना ब्रेक लावत आपल्या आगामी कारभाराचे संकेत दिल्यानंतर महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाºया स्थायी समितीची आक्रमकता वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने रणनीती आखली आहे.

नाशिक : महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत विविध कामांना ब्रेक लावत आपल्या आगामी कारभाराचे संकेत दिल्यानंतर महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाºया स्थायी समितीची आक्रमकता वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने रणनीती आखली आहे. त्यानुसार, स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर लढाऊ ब्रिगेडला पुढे चाल देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बुधवारी (दि. २८) महासभेत घोषित करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्तीत त्याचा प्रत्यय आला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त करण्यात आले. त्यात भाजपाचे ४, शिवसेनेचे २ आणि कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश होता. या रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि. २८) विशेष महासभा बोलावली होती. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीने कामकाजाला सुरुवात केली आहे, त्याचा धसका सत्ताधारीसह विरोधी पक्षानेही घेतला आहे. कामांची आवश्यकता, तांत्रिक योग्यता व व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा अवलंब करत त्यांनी आपल्या पहिल्याच महासभेत १५ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मागे घेतले; शिवाय नगरसेवक निधीतील कामांसह २५७ कोटींच्या रस्ते विकासकामांनाही ब्रेक लावला. त्यामुळे सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षातही अस्वस्थता आहे. त्यातच स्थायी समितीवर गेल्या महिनाभरात कामांचे प्रस्ताव रोडावल्याने आगामी काळात स्थायीवरचे पद शोभेचे राहते काय, या भीतीपोटी अनेकांनी अगोदर शर्यतीत असूनही नंतर स्थायीवर यावर्षी सदस्य म्हणून जाण्यास नकार दर्शविला. त्यामुळे शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टÑवादीने बळजबरीने बोहल्यावर चढविले. मात्र, भाजपाने आयुक्तांना रोखण्यासाठी लढाऊ ब्रिगेडला पुढे चाल देण्याची रणनीती आखली असून, त्याचा प्रत्यय बुधवारी स्थायीवरील नियुक्तीने दिसून आला आहे. भाजपाने सभागृहनेता दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांना स्थायीवर पाठविले आहे, तर शिवसेनेने संतोष साळवे आणि संगीता जाधव यांना संधी दिली आहे. कॉँग्रेसने समीर कांबळे यांना चाल दिली आहे, तर राष्टÑवादीकडून सुषमा पगारे यांच्या गळ्यात बळजबरीने सदस्यत्वाची माळ टाकण्यात आली आहे. महासभेत महापौरांनी या आठ सदस्यांची निवड जाहीर केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.भाजपाची पुढची यादीही तयारसत्ताधारी भाजपाने स्थायीवरील सर्वच्या सर्व नऊ सदस्य बदलण्याचे ठरविले असून, रिक्त झालेल्या चार जागांवर आता दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. भाजपाच्या उर्वरित पाचही सदस्यांचे राजीनामे घेण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिली. या पाच जणांच्या यादीत भाजपाचे गटनेते संभाजी मोरूस्कर, कमलेश बोडके, कोमल मेहरोलिया, भिकूबाई बागुल आणि हिमगौरी आडके यांची नावे अंतिम करण्यात आल्याचे समजते. शिवसेना व मनसेकडूनही उर्वरित सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्या चेहºयांना संधी दिली जाणार आहे. येत्या ७ मार्च रोजी त्यासाठी विशेष महासभा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा