शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

येवल्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 3:20 PM

मे महिन्यापर्यंत कांदा दोन-तीनशे रुपये क्विंटल दराने विकला गेला तेव्हा सरकार झोपले होते. सोयाबीनला बरा भाव मिळत असताना सोयाबीन तेल आयात करून स्थानिक बाजारभाव पाडले.

भाऊराव वाळके

जळगाव नेऊर (जि. नाशिक) : केंद्र शासनाच्या ४० टक्के निर्यात मूल्य आकारणीचा शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेने सोमवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर - मनमाड रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदवला.केंद्र सरकारने कोणाची मागणी नसताना कांदा निर्यात शुल्कात वाढ करून शेतकऱ्याला आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही हे सिद्ध केले आहे.

मे महिन्यापर्यंत कांदा दोन-तीनशे रुपये क्विंटल दराने विकला गेला तेव्हा सरकार झोपले होते. सोयाबीनला बरा भाव मिळत असताना सोयाबीन तेल आयात करून स्थानिक बाजारभाव पाडले. मे महिन्यात शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले त्याचा लाल चिखल झाला. त्यावेळी सरकार झोपले होते; मात्र, मागील महिन्यात पुरवठा कमी मागणी जास्त झाली. त्यामुळे टोमॅटोला भाव मिळू लागताच नेपाळहून टोमॅटो आयात करण्याचे फर्मान काढले. कापसाच्या गाठी आयात करून कापसाचे भाव पाडले. मग, या सरकारला शेतकरीमुक्त भारत करायचा आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याचे संघटनेने सांगितले.

शेतकरीविरोधी धोरणाचा शरद जोशी स्थापित संघटना तीव्र निषेध करते आणि कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के केलेल्या वाढीचा निषेध म्हणून सोमवारी चक्का जाम करून नगर - मनमाड रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. सर्व शेतकऱ्यांनी आजचे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचे असून, केंद्र सरकारने तातडीने चाळीस टक्के निर्यात मूल्य आकारणीचा अध्यादेश रद्द करावा; अन्यथा शेतकरी लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेण्याचा इशारा या प्रसंगी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला.

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, संध्या पगारे, संचालक, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी संघटनेचे येवला तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब पगारे, अरुण जाधव, जाफर पठाण, शिवाजी वाघ, सुरेश जेजूरकर, आनंदा महाले, राऊसाहेब गायकवाड, सुनील गायकवाड, नारायण बारहाते, नीलेश महाले, दत्तात्रय गायकवाड, प्रवीण गायकवाड आणि सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक