शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

चार तालुक्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:16 AM

राज्यातील कोरेानाची स्थिती काही जिल्ह्यांमध्ये अजूनही नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी प्रवाशांना ...

राज्यातील कोरेानाची स्थिती काही जिल्ह्यांमध्ये अजूनही नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी प्रवाशांना एस.टी. बसमधून प्रवास करता येणार नाही. गर्दीची ठिकाणे टाळून काेरोनाचा प्रसार रोखण्याचा भाग म्हणून बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ १५ टक्के क्षमतेने कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आलेले आहेत.

जिल्हा तसेच जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या बसेस या केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच पाठविल्या असल्याचे नाशिक विभागीय एस.टी. वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. दैनंदिन प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार संबंधित मार्गावर तसेच जिल्ह्यासाठी बसेस सोडल्याा जात आहे. त्यामुळे उत्पन्नाचा विचार करण्यात आलेला नाही. महामंडळाला दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांचा मे महिन्याच्या वेतनाचा प्रश्नदेखील उपस्थित होणार आहे.

--इन्फो--\

शहरातील प्रवासी बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगून राज्य परिवहन महामंडळाने शहर बसेस चालविणे यापूर्वीच कमी केले आहे. महामंडळाला होणारा तोटा पाहता कोरोनाच्या परिस्थितीनंतरही शहर बसेस चालविण्याबाबत नाशिक विभागीय महामंडळाची तयारी नसल्याचे समजते. त्यामुळे शहर बससेची अनिश्चितता पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे.