शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

केशरी कार्डधारकांनाही मिळणार अन्नसुरक्षेचा लाभ

By admin | Published: November 15, 2016 2:21 AM

शासनाचा निर्णय : २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित

नाशिक : अन्नसुरक्षेचा लाभ देताना भेदभाव झाल्याचा सार्वत्रिक होणारा आरोप पाहता केंद्र सरकारने अत्यल्प उत्पन्न गट असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून, अंत्योदय योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित करून डिसेंबरपासून प्रत्यक्ष स्वस्त दरात धान्याचे वाटप केले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने नाशिक शहरातील एक लाख २१ हजार नागरिकांना नव्याने अन्नसुरक्षा योजनेत सामावून घेतले जाणार असून, अंत्योदय योजनेतही सुमारे दोन हजार नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्रातील आघाडी सरकारच्या काळात अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती, त्यात ग्रामीण भागातील ४६ टक्के तर शहरी भागातील २८ टक्के जनतेचा अधिकाधिक समावेश करण्यात आला. मात्र यातील लाभार्थी ठरविताना वार्षिक उत्पन्न जरी विचारात घेतले गेले असले तरी, त्यात मोठ्या प्रमाणावर भेदभाव झाला होता. एकाच ठिकाणी व सारखेच उत्पन्न असतानाही एकाला या योजनेचा लाभ मिळाला व दुसऱ्याला डावलण्यात आल्याने यासंदर्भात नेहमीच तक्रारी केल्या जात होत्या. राजकीय पक्ष, झोपडपट्टीवासीयांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या सर्व गोष्टींची दखल घेत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देणाऱ्यांच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न ५९ हजाराच्या आत असलेल्या कुटुंबीयांना त्यात सामावून घेण्यात येणार असून, अंत्योदय योजनेतही अधिक कुटुंबाना संधी मिळणार आहे. सध्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यात सहभागी करून घेतले जाईल. शासनाने यासाठी मुदत निश्चित केली असून, २५ नोव्हेंबरपर्यंत लाभेच्छुक निश्चित केले जातील. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून याद्या मागविण्यात आल्या आहेत. त्या याद्या तपासून नंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील व अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी शहरातील रेशन दुकानदारांची शनिवारी धान्य वितरण अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन लाभेच्छुकांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)