शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

चाळीतील शिल्लक कांद्याला मोड

By admin | Published: November 15, 2016 12:19 AM

चाळीतील शिल्लक कांद्याला मोड

 निफाड : यंदा भाव पडल्याने उत्पादक हवालदिलनिफाड : यंदा कवडीमोल भाव मिळाल्याने उन्हाळी कांद्याने उत्पादकांना रडवले आहे. चांगला भाव मिळेल या आशेने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यालाही कांद्याना मोड यायला लागल्याने कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.यावर्षी तालुक्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव घसरले आहेत. आज ना उद्या चांगला भाव मिळेल या आशेने काही शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु सरकारने नियमनमुक्तीचा नियम लागू केल्याने बाजार समित्यांनी या नियमास विरोध करीत जवळ जवळ दोन महिने बाजार समित्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे सर्व कांदा चाळीमध्ये तसाच पडून राहिला. उन्हाळा, बेसुमार पाऊस यामुळे चाळीतील बराच कांदा सडून गेला. त्यात लिलाव चालू झाल्यानंतर कांद्याला २०० ते ७०० रुपये इतका कमी भाव मिळत असल्याने यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. दिवाळीतील सुटीनंतर बाजार समित्यांमधील लिलाव सुरू झाले. परंतु कांद्याचे भाव ७०० च्या वर गेले नाही. कांद्याला सरासरी फक्त ५०० रूपये भाव मिळाला. सद्य स्थितीत बराच कांदा चाळीत तसच पडून आहे. त्यातील बराच कांदा उन्हाळ्यात खराब झालेला असताना उर्वरित कांद्याला अतिथंडीमुळे मोठ्या प्रमाणात मोड येण्यास सुरुवात झाली आहे. ६० टक्के कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक होणार असून, कांदा उत्पादकांचे यावर्षीचेही आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. तालुक्यातील राजकीय नेते आपला वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करताना दिसत आहे. परंतु कांद्याच्या कोसळलेल्या भावांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असताना कांदा प्रश्नावर आंदोलन करायला ना या राजकीय नेत्यांना वेळ आहे, ना शेतकरी संघटनांना. सर्वच शेतकरी अस्वस्थ आहे. (वार्ताहर)