शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्वधर्म समभाव होता : कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 14:16 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर व आपल्या सैन्यावर आई-वडीलांसारखे प्रेम केले. तसेच यामुळे जनतेनेही त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले.

ठळक मुद्देमुस्लिमांच्या भावना कधीही दुखावल्या नाहीसैन्यात अनेक मुस्लिम मावळेही होतेआदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवण्याची गरज

नाशिक :छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर व आपल्या सैन्यावर आई-वडीलांसारखे प्रेम केले. तसेच यामुळे जनतेनेही त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले. त्या काळात भारतावर असलेले मुस्लिमांच्या राज्याला उतरती कळा लावणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते. मात्र त्यांनी मुस्लिमांच्या भावना कधीही दुखावल्या नाही. असे राजकीय विश्लेषक व विचारवंत रावसाहेब कसबे यांनी सांगितले.    अ‍ॅड. दौलतराव घुमरे लिखित ‘प्रज्ञावान भुमिपुत्र शिवाजी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि.१९) रावसाहेब थोरात सभागृह येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी त्यांनी असे सांगितले की, शिवाजी महाराज हे सर्व धर्मांना समानता देणारे व सर्वांचा सन्मान करणारे राजे होते. त्यांनी त्यावेळी राजकारण व धर्मकारण यांची एकप्रकारे फारकतच केली होती. त्यांच्या काळात त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम मावळेही होते. छत्रपतींचे आरमारही एका मुस्लिम व्यक्तिने उभारले होते. त्यामूळे शिवाजी महाराज व मुस्लिमांमध्ये एक जवळचे नाते होते. मात्र आज देशात जाती पातीमुळे देश मागे येत आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचे कसबे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, महाराष्टÑ व गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बी. जी. पाटील, माजी न्यायाधिश एम. जी. गायकवाड, बार कॉन्सिलचे संचालक अविनाश भिडे, रोजा देशपांडे, स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास