शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

गंगापूररोडवर मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:18 IST

गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून नेत असल्याचे दिसते.

गंगापूर : गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून नेत असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांपासून कोंडवाडे नामशेष होत चालले असून, शहरात व ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर आणि उपद्रव वाढला आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.शहरी व ग्रामीण भागात पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने मोकाट जनावरे बाजारपेठेत व मुख्य रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने नागरिकांना आपली वाहने चालवणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर, गंगापूर, गोवर्धन या ठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्याने रस्त्यावरील वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. जोपर्यंत एखादा अपघात होत नाही तोपर्यंत त्यांचे मालक अदृश्य असतात. दरम्यान एखाद्या वाहनाने या जनावरांना गाडीने उडवले तर सर्व अदृश्य झालेले मालक आपला दावा दाखविण्यासाठी व भांडण करण्यासाठी नेहमी तयार असतात. महापालिका अथवा गोवर्धन ग्रामपंचायत या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्याची व मालकांना दंड करण्याची तसदीसुद्धा घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. जनावरांनी रस्त्यावर टाकलेल्या विष्ठेवरून दुचाकी वाहने घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाशिक महापालिका या घटनांकडे सरार्सपणे दुर्लक्ष करत आहे. या मोकाट जनावरांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने जनावरांना बंदिस्त करण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती करावी. मोकाट जनावरांना या कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या मालकांवर दंड आकारणी करावी, अशी मागणी गंगापूररोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर या भागात रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे घोळका करून बसतात अन् तिथेच घाण करतात. परिणामी वाहनचालकांना आपली वाहने हळू चालवावी लागतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात रोज घडतात. महापालिकेने यावर त्वरित कारवाई करायला हवी.- अरु ण पाटील, रहिवासीमोकाट जनावरांवर वेळीच कारवाई करायला हवी. जनावरे रस्त्याच्या मधोमध बसल्याने आणि तिथेच घाण केल्याने दुचाकीचालक व चारचाकी चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होतो, त्यामुळे या मोकाट जनावरांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करावी.- सुरेश गायकवाड, आनंदवली

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा