शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

तिरंगी लढतीकडे शहराचे लक्ष

By admin | Published: November 17, 2016 11:17 PM

येवला : राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा बंडखोर झुंजणार

येवला : सलग दोन पंचवार्षिक राष्ट्रवादीने उमेदवारीचे गाजर दाखवले, पक्ष बदलला, भाजपाने थेट उमेदवारीचे आश्वासन दिले. पुन्हा डावलले गेले. नाराजी झाली. पुन्हा बंडाचा पवित्र घेऊन भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रीतिबाला पटेल यांनी अपक्ष उमेदवारी केली. निवडणूक म्हटली तर कोणीतरी एकच उमेदवार विजयी होणार असला तरी या प्रभागात तिरंगी लढतीत मात्र रंगत आली आहे.येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ अ मधून चंदा सोहन दुगड (राष्ट्रवादी), छाया शैलेश देसाई (शिवसेना), कृष्णा संतोष परदेशी (कॉँग्रेस) व प्रीतिबाला राजीव पटेल (भाजपा बंडखोर- अपक्ष) हे चार उमेदवार रिंगणात असले तरी लढत मात्र राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा बंडखोर-अपक्ष उमेदवार यांच्यात आहे.येवला पालिकेच्या प्रभाग क्र मांक ७ अ मधून राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीत भाजपाने प्रीतिबाला पटेल यांना उमेदवारीची संधी देण्याचा निश्चय केला होता; परंतु या संपूर्ण प्रभागात भाजपा-सेनेला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. (वार्ताहर)४शिवसेनेने या प्रभागात दोन्ही जागांवर हक्क सांगितला. आणि भाजपा महिला आघाडीच्या प्रीतिबाला पटेल यांना पक्षाची उमेदवारी रोखली गेली. संतप्त झालेल्या प्रीतिबाला पटेल यांच्या मनधरणीचा पाढा वाचला गेला. परंतु गुजराथी समाजाच्या मतांच्या गणिताची आकडेवारी लक्षात घेऊन रणांगणात लढणे पसंत करीत अपक्ष उमेदवारी केली. दुसरीकडे शिवसेनानेते संभाजीराजे पवार समर्थक छायाबाई शैलेश देसाई यांना उमेदवारी बहाल करून गुजराथी समाजाला संधी दिली, तर राष्ट्रवादीने सुप्रसिद्ध कपडा व्यापारी चंदा सोहनलाल दुगड यांना उमेदवारी देऊन जैन कार्ड टाकले. आता प्रीतिबाला पटेल किती ताकद लावतात आणि गुजराथी अथवा मारवाडी समाजाची किती मते खेचतात की देसाई अथवा दुगड यापैकी कोणाच्या विजयाचे गणित बिघडवतात हे प्रत्यक्ष मतदानातून कळेल. तोपर्यंत ही तिरंगी लढत चर्चेत येणार असल्याची चिन्हे आहेत. या प्रभागात कायम प्रभाव ठेवून असणारे पंकज पारख आणि नीलेश पटेल, भाजपाचे नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार सुशीलभाई गुजराथी, संभाजी पवार यांची सक्रि य मदत व त्यांची या प्रभागातील निर्णायक भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मारवाडी,गुजराथी समाजाची निर्णायक ९०० मते,यांची ध्रुवीकरणाची प्रक्रि या उमेद्वारच्या वातावरणानुसार बदलली जाणारी आहे.या प्रभागात असणारा मतदार हा येवला मर्चंट बँकेचा मतदार आहे.सुज्ञ ,सुशिक्षति मतदार असल्याने क्र ॉस मतदानाचा प्रयोग करण्याची त्यांची अभ्यासपूर्ण पद्धत विजयाच्या गणतिावर परिणाम करणारी आहे.कार्यकर्त्यांचे मोहळ असून चालत नाही.अंतिम टप्प्यात आर्थिक बाजू महत्वाची ठरते हाच मुद्दा निर्णायक विजय मिळवून देणारा ठरणार आहे.साळी गल्ली,देशपांडे गल्ली,हमाल गल्ली हा भाग विजयाच्या प्रक्रि येत महत्वाचा आहे.भाजप शहर अध्यक्ष आनंद शिंदे आण िमहिला आघाडीच्या प्रीतीबाला पटेल यांना या प्रभागातून भाजपच्या उमेदवारीवरून नगरसेवक पदावरून आउट व्हावे लागले आहे.हि घटना निवडणुकीचे गणति बिघडवते का? हे पाहण्यासाठी वाट बघावी लागेल.