शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

पतसंस्था संचालकांचा घेराव

By admin | Published: November 13, 2016 1:00 AM

भरणा स्वीकारावा : आर्थिक पुरवठ्याची मागणी

राशिवडे : भोगावती साखर कारखान्यावर प्रशासक आल्याने अनागोंदी कारभाराला आळा बसेल असे वाटत असताना ‘भोगावती’चा कारभार मात्र आर्थिक खाईत रुतत चालला आहे. जंबो भरती करूनही कुशल कामगार पाहिजेत या नावाखाली सेवानिवृत्त कामगारांना परत कामावर रुजू करून घेतले आहे.अधिकाऱ्यांची मनमानी आणि प्रशासकांच्या दुर्लक्षाने ‘भोगावती’चा यावर्षीचा गळीत हंगाम निर्विघ्न व पुढील गळीत हंगामात कारखाना चालू होणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखाना आर्थिक संकटातून जात असताना जंबो भरती होऊनही कंत्राटी कामगार नेमायचे, अधिकाऱ्यांनी काटकसरीचा कारभार न करता आपली व सग्यासोयऱ्यांची सोय पाहायची यामुळे आधीच डबघाईला आलेल्या कारखान्याला पुन्हा आर्थिक अरिष्टात रुतवायचे काम सुरू आहे.‘भोगावती’ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागील हंगामात नवीन ५८० जणांची जंबो नोकर भरती झाली; मात्र तज्ज्ञ कामगारांच्या नावावर संचालक मंडळाने अकुशल नातेवाइकांची वर्णी लावली. तज्ज्ञ नसल्याने बॉयलर विभागात वीस, तर उत्पादन विभागाकडे दहा सेवानिवृत्त कामगारांना मासिक पंधरा हजार रुपये पगारावर पुन्हा कामावर घेतले आहे. नवीन नऊ अधिकाऱ्यांनी आपला पगार वाढवून घेतला. हे करताना कोणत्या ठरावाने पगारवाढ घेतली हे प्रशासकीय संचालक मंडळास माहिती नसल्याचे स्पष्ट होत आहे.पूर्णवेळ प्रशासक असूनही दुपारनंतर येणारे प्रशासक, जंबो नोकर भरती करूनही कंत्राटी कामगारांकडून होत असलेले काम यामुळे ‘भोगावती’च्या प्रशासनाच्या कामाबाबत शंका उत्पन्न होत आहे. कार्यक्षेत्रात तज्ज्ञ युवकांची फौज असताना सेवानिवृत्तांना पुन्हा का बोलावून घेतले हा संशोधनाचा विषय आहे. कार्यक्षेत्रात अन्य कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या उतरल्याने ऊस बाहेर जाऊ लागला आहे. या हंगामात भोगावती प्रशासनाने पाच लाख टन गळिताचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे आव्हान कसे पेलणार हा प्रश्न आहे. (वार्ताहर)