शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
4
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
5
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
6
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
7
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
8
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
10
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
11
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
12
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
13
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
14
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
15
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
16
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
17
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
18
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
19
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
20
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

राष्ट्र बलाढ्य होण्यास जातीय व्यवस्थेचा अडथळा

By admin | Published: January 04, 2017 12:29 AM

वासुदेव गाडे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण

नाशिक : देशभरात जातीचे राजकारण फोफावले असून, ही परिस्थिती लवकरात लवकर बदलायला हवी. देशातून याआधीच जाती नाहीशा केल्या असत्या तर भारत देश नक्कीच बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखले जाऊ लागले असते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी (दि. ३) येथील नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शालिमार येथील आयएमए सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना गाडे यांनी, शिक्षक आणि वाचनालयाचा घनिष्ट संबंध असून समाजासाठी या दोघांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरत असल्याचे सांगताना अनेकदा सुशिक्षित समाज म्हटले जात असताना समाजात होणाऱ्या अत्याचारासारख्या घटनांवर परिणाम का होत नाही, असा सवाल उपस्थित केला.  सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देताना समाजातील अनाथपण कमी होण्यासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच बालके किंवा विद्यार्थीच फक्त अनाथ नसून आपल्या सभोवताली एकटे राहणारे वृध्ददेखील अनाथ असून हे अनाथपण दूर करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यावेळी केले. वाचनालयाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी जातीचे राजकारण थांबायला हवे, असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक राजू देसले, मानपत्र वाचन डॉ. हेमलता पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना शार्दुल-थोरात यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राजू देसले, ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रा. मनोहर जाधव आणि डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)सन्मानार्थीनारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रा. डॉ दिनेश शिरूडे (एम.एस.जी. महाविद्यालय, नामपूर), प्रा. डॉ. विवेक खरे (एस.एम.आर.के. महाविद्यालय, नाशिक), कल्पना क्षीरसागर (जिल्हा परिषद शाळा, लाडची), फ्रान्सिस वाघमारे (सेंट फिलोमिना इंग्लिश स्कूल, नाशिकरोड), नारायण भोये (सर्व इंग्लिश मीडिअम स्कूल, चिखलवाडी, त्र्यंबकेश्वर), मनोज दिंडे (वैशंपायन कला, वाणिज्य आणि विज्ञान रात्र महाविद्याय, नाशिक) यांचा समावेश होता.