शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

जलयुक्तची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करा

By admin | Published: December 24, 2015 12:21 AM

आढावा बैठक : आयुक्तांच्या सूचना

नाशिक : जलयुक्त शिवार योजनेची सर्व कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत झाली पाहिजेत, तसेच महसुली वसुलीचे दिलेले २०८ कोटींचे उद्दिष्ट तीन महिन्यांत पूर्ण करा,असे आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.बुधवारी (दि. २३) आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्णात जेथे जेथे टंचाई सदृश परिस्थिती असेल तेथे तत्काळ पाणीपुरवठ्याची सोय करण्यात यावी. जलयुक्त शिवाराची कामे त्यासाठीच फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करावीत, जेणेकरून टंचाईच्या समस्येला या गावांना तोंड द्यावे लागणार नाही. तसेच सद्यस्थितीत पाण्याची आवर्तने वेगवेगळ्या धरणातून सोडली जात आहेत. ती आवर्तने शेवटच्या टोकाला असलेल्या गावांपर्यत पोहोचली पाहिजेत. मध्येच कोणी पाटचारीमधून पाणी चोरणार नाही, याची दक्षता घ्यावी,असे आदेशही यांनी यंत्रणेला दिले. तसेच महसूल विभागाला चालू आर्थिक वर्षात २०८ कोटींचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ९७ कोटींचाच महसूल गोळा झाला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित १११ कोटींचा महसूल वसूल करावा, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह सर्वच अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)