शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नाशिकमध्ये जलजीवनचे काम संपले, कंत्राटी अभियंते तहानलेले; नऊ महिन्यांपासून विनावेतन काम

By श्याम बागुल | Updated: July 29, 2023 17:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेची घोेषणा करण्यात आली होती.

नाशिक : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘हर घर जल’ या जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी झाली असून, जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे सुरू होऊन घराघरात नळाद्वारे थेट पाणीपुरवठा सुरू झालेला असताना मात्र या कामासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांना मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. शिवाय काम संपल्यामुळे आता त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतल्याने शासनाची इमानेइतबारे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेची घोेषणा करण्यात आली होती. ग्रामीण भागातील जनतेला थेट घरात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर सोपविण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे खासगी कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कनिष्ठ अभियंत्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती. गावोगावी जाऊन तेथील पाण्याचे स्रोत शोधणे, त्याचे अंदाजपत्रक तयार करणे अशा सर्व प्रकारची कामे दिवस-रात्र या कंत्राटी अभियंत्यांकडून करून घेण्यात आली. प्रत्यक्षात ही कामे सुरू झाली. त्यातील काही कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची तपासणी, देखरेख आदी कामे त्यांच्याकडून करून घेण्यात आली. मात्र, साधारणत: गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना त्यांचे दरमहाचे वेतनापोटी दिले जाणारे मानधन देण्याचा जिल्हा परिषदेला विसर पडला.

टॅग्स :Nashikनाशिक