शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

कादवाच्या संचालक मंडळाला साथ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:54 AM

दिंडोरी : राज्यात अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने बंद पडत असताना श्रीराम शेटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कादवा सुरू ठेवत सहकार क्षेत्रापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. कादवा सुस्थितीत सुरू असून, कादवाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संचालक मंडळाला साथ द्यावी, असे आवाहन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

ठळक मुद्देबाळासाहेब सानप : कादवा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

दिंडोरी : राज्यात अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने बंद पडत असताना श्रीराम शेटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कादवा सुरू ठेवत सहकार क्षेत्रापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. कादवा सुस्थितीत सुरू असून, कादवाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संचालक मंडळाला साथ द्यावी, असे आवाहन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, राहुल आहेर, माजी आमदार शिरीष कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, संजय पडोळ, सदाशिव शेळके, कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, सर्व संचालक , युनियन अध्यक्ष सुनील कावळे आदींच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. त्यावेळी आमदार सानप बोलत होते. प्रारंभी दिलीप देशमुख, अशोकराव संधान, तानाजी बर्डे, बापू जाधव, मदनराव केदार आदींच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले.आमदार सानप यांनी कादवाची वाटचाल प्रतिकूल परिस्थितीत दिमाखात सुरू असल्याचे गौरवोद्गार काढले. कादवाने सर्वाधिक भाव व वेळेत पैसे दिले आहेत; मात्र केवळ साखर उत्पादनातून कारखाने चालविणे अवघड आहे. म्हणूनच केंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पाबाबत पॅकेज जाहीर केले असून कादवाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तालुक्यातील अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी नियोजन करण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील धरणातील पाण्याचे नियोजन करताना लाभधारक शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी कमी करू नये यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, पाणीप्रश्नावर सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले.यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील यांची भाषणे झाली. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, यू.पी. मोरे, भास्कर भगरे, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, विश्वनाथ देशमुख, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, सुनील केदार, सुभाष शिंदे, सुनील कावळे आदींसह सभासद, कारखान्याचे अधिकारी कामगार उपस्थित होते.गाळप क्षमता वाढविण्याचा प्रयत्नकारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी यंदा कादवाने प्रतिदिन २००० मेट्रिक टन गाळप करीत तीन लाखांहून अधिक मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले. कादवाने एफआरपी अदा केली आहे. साखर उतारा वाढावा यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. गाळप क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून, एक बॉयलर, टर्बाइन व मिल टाकल्यास दररोज २५०० मेट्रिक टन गाळप होणे शक्य होणार असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. शेतकºयांनी पाणी मागणी फॉर्म भरावे ,कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन शेटे यांनी केले.