शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 01:01 IST

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक ठरत आहेत. त्यातच गेल्या महिनाभरात कोरोनामुक्तीचा दर साडेपाच टक्क्यांनी वाढला असून मालेगाव शहराचीही कोरोनामुक्तीकडे आश्वासक वाटचाल सुरू असल्याचे सुखद चित्र आहे. जिल्ह्यात महिनाभरात एक लाख ३९ हजार रुग्णसंख्या वाढली तर १ लाख ३४ हजार ७८६ रुग्ण कोरोनाला हरवून घरी सुखरूप परतले आहेत.

ठळक मुद्देदिलासादायक : मालेगाव शहराचीही आश्वासक वाटचाल

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक ठरत आहेत. त्यातच गेल्या महिनाभरात कोरोनामुक्तीचा दर साडेपाच टक्क्यांनी वाढला असून मालेगाव शहराचीही कोरोनामुक्तीकडे आश्वासक वाटचाल सुरू असल्याचे सुखद चित्र आहे. जिल्ह्यात महिनाभरात एक लाख ३९ हजार रुग्णसंख्या वाढली तर १ लाख ३४ हजार ७८६ रुग्ण कोरोनाला हरवून घरी सुखरूप परतले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेच्या चिंता वाढविल्या. रोज वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच ऑक्सिजन बेड व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधावही झाली.दरम्यान, कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता गावोगावी जनता कर्फ्यू घोषित झाले. कडक निर्बंध लावण्यात आले. परिणामी, रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असून कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात महिनाभरापूर्वी ६ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या २ लाख ३ हजार २६ इतकी होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ६ मे रोजी रुग्णसंख्या ३ लाख ४२ हजार ९१ वर जाऊन पोहोचली. महिनाभरात जिल्ह्यात १ लाख ३९ हजार ६५ रुग्ण कोरोनाने बाधित झाल्याचे समोर आले. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच कोरोनातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. महिनाभरापूर्वी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ६९ हजार ७७६ इतकी होती. ती आता ६ मे रोजी ३ लाख ४ हजार ५६२ वर जाऊन पोहोचली आहे. महिनाभरात १ लाख ३४ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. महिनाभरापूर्वी कोरानामुक्तीची टक्केवारी ८३.६२ टक्के होती. ती आता ८९.०३ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. एका महिन्यात कोरोनामुक्तीचा दर साडे पाच टक्क्यांनी वधारला आहे. हे एक चांगले सुचिन्ह मानले जात आहे.महिनाभरात ११९५ जणांचे बळीजिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर समाधानकारक असतानाच गेल्या महिनाभरात ११९५ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना बाधा होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. ६ एप्रिल २०२१ पर्यंत जिल्ह्यात २४९७ रुग्णांचे बळी गेले होते. महिनाभरात ही संख्या ३६९२ इतकी झालेली आहे. दरम्यान, उपचार घेणाऱ्यांमध्येही महिनाभरात ३ हजार ८४ रुग्णांची भर पडलेली आहे. सद्यस्थितीत ३३ हजार ८३७ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय