शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

CoronaVirus News : ना जत्रा, ना यात्रा, गावाेगावी कोरोनाचा खतरा; तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 18:48 IST

सचिन सांगळे नांदूरशिंगोटे : गत दोन वर्षांपासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागातील गावागावांतील जत्रा भरतील, ...

सचिन सांगळे

नांदूरशिंगोटे : गत दोन वर्षांपासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागातील गावागावांतील जत्रा भरतील, असे वाटत असतानाच पुन्हा ओमायक्रॉनचे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो मोलमजुरी करणाऱ्या तसेच गावच्या जत्रांवर अवलंबून असलेल्या तमाशा, ऑर्केस्ट्रा, मंडप डेकोरेटर, खेळणीसह विविध प्रकारचे दुकानदार या व्यावसायिकांना. सध्या यात्रांचा हंगाम असला तरी कोरोनामुळे यात्रा बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद असून या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

चंपाषष्ठीनंतर ग्रामीण भागातील यात्रा उत्सव सुरू होतो. यात्रा म्हटले की वर्षभरातील कामातून वेळ काढून देवदेवतांचे दर्शन आणि निखळ मनोरंजन एक हौस वेगळीच असते. यादरम्यान, नोकरी कामधंद्यासाठी गाव सोडून इतरत्र गेलेले ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहकुटुंब गावाला येत असतात. त्याचप्रमाणे सासुरवाशीण मुली-महिला आपल्या माहेराला, पाहुणे मोठ्या उत्साहाने यात्रेस येत असतात. दोन दिवसांच्या या यात्रेत देवदेवतांची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, ढोल, लेझीम, छबिना, मिरवणूक, आरती, कुस्त्या व ऑर्केस्ट्रा, तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जातात. त्यामुळे जत्रेचा एक वेगळाच आंनद अनुभवयास मिळत असतो. गावातील रथ मिरवणुकीत आबालवृद्धांसह तरुण वर्ग तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या संकटाने सर्वांचाच हिरमोड झाला आहे. २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तर यावर्षी ओमायक्रॉनचे संकट वाढत असल्यामुळे शासनाने पर्यटनासह विविध कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे यावर्षी ओमायक्रॉनमुळे या सर्वांवर विरजण पडले आहे. सध्या तालुक्यातील विविध भागांतील यात्रा, उत्सव सुरू झाले आहेत. मात्र, अगदी साध्या पद्धतीने हे सण, उत्सव साजरे करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील गावे या चार महिन्यांत खूप गजबजलेली असतात परंतु आता कोरोनामुळे जत्रा असूनदेखील गजबजलेली गावे अगदी शांत वाटत आहेत.

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे जत्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विविध खेळणी, फरसाण, भेळ, जेवण बनवणारे केटरर्सवाले, ढोल-लेझीम खेळ, झांज पथके, ऑर्केस्ट्रा हे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. तर तमाशा कलावंतांवर तीन वर्षांपासून जत्राच भरत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या