शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाणीपुरवठा योजना बंद असल्याने टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:59 IST

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देन्यायडोंगरीसह गावे तहानलेली

नाशिक : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.सदरची योजना तत्काळ सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर असले तरी, सद्यस्थितीत न्यायडोंगरी या गावातील विविध नळ योजनांची उद्भव पाण्याची पातळी खालावल्याने नळ योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नवीन योजनेत गिरणा धरण ते न्यायडोंगरी दरम्यान पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. गावात पाणीटंचाई निर्माण झालेली असून, जवळपास पंधरा हजारांहून अधिक नागरिक पाण्यापासून वंचित आहेत.नवीन योजना लवकरात लवकर सुरू न केल्यास न्यायडोंगरी व लगतच्या पाच वाड्या, वस्त्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टंचाई अंतर्गत खर्च वाढणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई टाळण्यासाठी नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदार, ग्रामपालिका यांच्याशी समन्वय साधून पाणीपुरवठा योजना सुरू करावी.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई