शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
4
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
5
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
6
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
7
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
8
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
9
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
10
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
11
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
12
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
13
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
14
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
16
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
17
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

एरंडगाव परिसरात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 9:47 PM

एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत.

एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आभाळात सदैव पावसाचे काळे ढग दिसतात. मधूनमधून पावसाच्या सरी येत असतात. क्वचितच सुर्य दर्शन होते. संततधारेमुळे सगळीकडे दलदल निर्माण झाली आहे. पिकांच्या पोषणासाठी उन्हाची गरज असते पण ऊन पडतच नाही. मूग, बाजरी ही पिके अनेक दिवसांपासून काढणीस आली आहेत. सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामूळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्तम प्रतीचा मूग बाजारात सात हजार रु पये क्विंटल च्या दरम्यान विकला जातो तर काळसर मुगास फक्त हजार पंधराशाचा भाव मिळतो.भाजीपालाही सडून जात आहे. सोंगणीस आलेली बाजरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. सोयाबीन पिवळे पडले आहे. चाळीतील कांदे सडू लागले आहे. शेतीची मशागत करणे, पिकांंची निगा राखणे, औषधे, खते टाकने हे शेतकर्यांच्या हाती आहे पण नैसिर्गक हानी व बाजारभावतील घसरण शेतकर्?यांच्या हाती नसल्याने भांडवल खर्च करून व रात्रंदिवस कष्ट करूनही पदरात काहीच पडत नाही. एक संकट पार केले की दुसरे संकट वाट आडवते त्यामूळे दिवसेंदिवस शेतकर्यांचे शारिरीक, मानिसक व आर्थीक बळ खचत चालले आहे.पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दत्तु वावधने, लहानू बारहाते, विट्ठल जगताप, शिवाजी खापरे, काकासाहेब पडोळ, देवीदास उराडे आदींनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती