शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

सांस्कृतिक आतंकवाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 3:29 PM

आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत.

आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत.मुळात श्रीराम म्हणजे भारताचा आत्मा!तुलसी रामायण --बंदउँ अवध पुरी अति पाविन। सरजू सरि कलि कलुष नसाविन॥प्रनवउँ पुर नर नारि बहोरी। ममता जिन्ह पर प्रभुहि न थोरी॥1॥भावार्थ:-मी अति पवित्र श्री अयोध्यापुरी आणि कालियुगाच्या पापांचा नाश करणारी शरयू नदीला मी वंदन करतो,आण िआयोध्यापुरीतील पुरु ष व स्त्रियांना वंदन करतो ज्यांच्यावर श्रीरामाची अतीव ममता आहे .त्यावरच आघात करण्याचा अत्यंत लांच्छनास्पद प्रयत्न नेपाळचे कोली करत आहेत. हा चीनची सगळी धोरणं राबवायचा फाजील प्रयत्न आहे.पण उगीच काड्या घालून वाद निर्माण करायचे आणि मूळ प्रश्नावरून लक्ष वळवायचे काम चालू आहे. श्रीराम भारताचा! भारत श्रीरामाचा! यात काहीच दुमत नाही. रामायण, तुलसी रामायण, आध्यात्म रामायण, आनंद रामायण हे सर्व ग्रंथ ह्या शर्मा ओली ह्यांना नावाने तरी माहीत आहेत का?. हे सर्व ग्रंथ रामायणाची पर्यायाने श्रीराम आणि भरतकुळाची इत्थंभूत माहिती देतात.श्रीरामाचा जन्म शरयू तीरावर, शरयू नदी कुठे, सर्व ग्रंथ ज्या गोष्टीची साक्ष देतात ती शरयू माता अयोध्येत, मग पंतप्रधान कोलीनी कुठल्या आधारावर श्री राम नेपाळी होते असं विधान केलं ते त्या पशुपतींनाथाला ठाऊक. मुळात श्री. ओली हे कम्युनिस्ट त्यांचा मुळात राजे राजघराणे ह्यांचा संबंधच नाही,आणि ते रामायणासारख्या विषयावर बोलणार हेच पटत नाही. रामायणामध्ये उल्लेखलेले श्रीराम जन्माचे स्थान मुळात आजच्या उत्तरप्रदेशातील अयोध्येतच आहे, असा पुरावा देणारे लाखोंनी हास्तलिखितांचे आधार - पुरावे आपण सगळे देऊ शकतो. मुळात श्रीराम जन्मासबंधीत झालेले पुत्रकामेष्टी याग ज्या स्थानी झाला त्या अग्निहोत्राशी संबधीत यागाची जागा त्यांच्या महालाजवळील होती, हे रामायाणामध्ये उल्लेख आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ झाल्यानंतर तो नैवेद्य-पायस भक्षण करण्यासंदर्भात जी कथा येते त्यातही निसर्ग आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती दिली ती अयोध्याच आहे. तुलसी रामायणामध्येही परिसर वर्णन आले आहे. पायस प्राशनानंतर श्रीराम जन्म आण िजन्मानंतरचा पूर्ण काळ हा वरील रामायणाच्या सर्वच ग्रंथात आला आहे, रामायणाचा संपूर्ण काळ ते मिथिला नरेशाची मुलगी सीता ह्यांचा विवाह ज्या वेळी झाला त्यावेळचा परिसराचाही उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे, पण एक अगदी पक्के सांगता येते की यात कोठेही नेपाळ मधील कुठल्याही परिसराचा उल्लेख नाही. या वादात पडण्यापेक्षा नेपाळी पंतप्रधानाला पुराव्यानिशी बोलण्याची विनंती करावी.दिनेश वैद्य, संचालक, व्यास रिसर्च सेंटर

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळेAyodhyaअयोध्या