शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर संस्था दादा भुसे : घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी परिषदेत कामकाजाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:00 IST

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीयघटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे. त्यासाठी पदाधिकाºयांना प्रशिक्षणाची गरज आहे. सध्या पुण्यात यशदाच्या माध्यमातून, असे प्रशिक्षण दिले जात असले तरी ग्रामपंचायत स्तरावरील बहुतेक पदाधिकाºयांना हे प्रशिक्षण घेणे शक्य होत नसल्याने शासनाकडून जिल्हास्तरावर पदाधिकारी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातील शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात ७३ व ७४ व्या घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि.५) विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त महेश झगडे, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे,अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे व महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण उपस्थित होते. दादा भुसे म्हणाले, ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीला २५ वर्षांचा कालवधी उलटला असताना स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारकडून राबविण्यात येणाºया विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. अनेक ग्रामीण वाड्या-वस्त्यांसह विविध गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे शहरासह विविध ग्रामीण भागात वस्त्र व निवाºयापासून वंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कायद्याच्या चौकटीत नियोजनबद्ध योजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. परिषदेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य व नगरसेवकांसह स्थानिक स्वराचे संस्थांचे प्रतिनिधी उपलब्ध होते. कुलगुरू ई. वायुनंदन यांनी प्रास्ताविक करताना विभागीय परिषदेच्या माध्यमातून घटनादुरुस्तीनंतर साध्य होऊ न शकलेल्या कामांवर व योजनांवर चर्चा होणार असल्याने घटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करणे अधिक सहज व सोपे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. विजया पाटील यांनी केले. प्रा. रघुनाथ गावडे यांनी आभार मानले.प्रगती व पुढील दिशामुक्त विद्यापीठातील विभागीय परिषदेत ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीनंतरच्या २५ वर्षांत झालेली ‘प्रगती व पुढील दिशा’ यविषयाला अनुसरून‘स्थानिक स्वराज्य संस्था व शासन परस्पर संबंध’ विषयावर पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्व समावेशक प्रशासन व निवडणूक सुधारणा आदी विषयांवरही चर्चा झाली, तर अखेरच्या सत्रात दिवसभरात झालेल्या विविध विषयांवर खुल्या चर्चासत्रानंतर परिषदेचा समारोप करण्यात आला. या परिषदेचे विभागातील पाचही जिल्ह्णात थेट प्रक्षेपण करण्यात आले.उद््घाटनाच्या समारोपाला महापौरांचे आगमनपरिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास महापौर रंजना भानसी यांची अनुपस्थिती जाणवत असतानाच त्यांचे आगमन झाले. परंतु तोपर्यंत उद्घाटन सोहळा आटोपून आभार प्रदर्शनाचे सोपस्कर सुरू झाले होते. याचवेळी महापौरांसह उपमहापौर अजिंक्य गिते, गटनेते दिनकर पाटील यांचे आगमन झाल्याने आभार प्रदर्शन थांबवून महापौरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या उशिराने पोहोचण्याच्या सवयींवर चांगलीच चर्चा रंगली.