शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
3
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
4
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
5
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
6
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
7
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
8
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
9
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'
10
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
11
रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?
12
Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...
13
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
14
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
15
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
16
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
17
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
18
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
19
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
20
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

दारणाचे पाणी थांबवले; ३५ टक्के तुटीची भीती

By श्याम बागुल | Published: November 05, 2018 6:47 PM

नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते

ठळक मुद्देजायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.१ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले,

नाशिक : जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला दारणा धरणाचा विसर्ग सोमवारी सायंकाळी थांबविण्यात आला. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी ८.९ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या निर्णयाने सदरचे पाणी सोडण्यात आले असले तरी, वाहनातील तूट लक्षात घेता जायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध दोन्ही जिल्ह्यांमध्ये आंदोलने होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. परंतु अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार पाणी सोडणे भाग पडले. गुरुवार १ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले, परंतु गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास महामंडळाने स्थगिती दिल्याने नाशिक जिल्ह्यातून सोडावयाचे ३.१४ टीएमसी पाणी दारणा धरणातूनच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भावली व मुकणे धरणांतून दारणा धरणात पाणी सोडण्यात आले. मराठवाड्यासाठी पाणी सोडत असताना या पाण्याची चोरी टाळण्यासाठी गोदावरीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तसेच कोल्हापूर बंधाऱ्यांचे निडल्स काढून जागोजागी पोलीस बंदोबस्तात पहारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गेल्या पाच दिवसांत ३.१४ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर सोमवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, पाण्याच्या वहनातील तूट व जागोजागी कोल्हापूर बंधाºयात फळ्या टाकून पाणी अडविण्याच्या प्रकारामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांतून ८.९ टीएमसी पाणी सोडण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात जायकवाडीत त्यापैकी जेमतेम ६५ टक्केच पाणी पोहोचू शकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३५ टक्के पाण्याची वहनात गळती व काही ठिकाणी पाण्याची चोरी झाल्याचा संशय आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक