शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पाळे खुर्द परिसरात यंदा कांदा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 01:01 IST

पाळे खुर्द : सद्यस्थितीत पाळे खुर्द परिसरातील रब्बी हंगामावर बेमोसमी पावसाचा परिणाम झाल्याने कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. यंदा कांदा पिकाचे उत्पादन एकरी ८० ते ९० क्विंटल झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असून एकरी सरासरी १८० ते १९० क्विंटल होणारे उत्पादन यंदा अर्ध्यावर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : भाजीपाला लागवडीबाबत संभ्रम

पाळे खुर्द : सद्यस्थितीत पाळे खुर्द परिसरातील रब्बी हंगामावर बेमोसमी पावसाचा परिणाम झाल्याने कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. यंदा कांदा पिकाचे उत्पादन एकरी ८० ते ९० क्विंटल झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असून एकरी सरासरी १८० ते १९० क्विंटल होणारे उत्पादन यंदा अर्ध्यावर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मिळालेल्या उत्पादनातून पिकासाठी केलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गामुळे भाजीपाला पिके करावी की नाही या संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत. कारण भाजीपाला पिके करण्यासाठी प्रथम रोपवाटिकेमध्ये पिकांची रोपे नोंदवावी लागतात. त्यानंतर रोपे मिळतात. रोपे लागवड करून पिके घेतली जातात. पुढील खर्च हा एकरी लाखात आहे. लाखो रुपये खर्च करून लॉकडाऊन राहिला तर आपला शेतमाल कुठे विकायचा अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पाळे खुर्द परिसरात कांदा पिकानंतर टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, वाल पापडी व गवार आदी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु कोरोनाच्या संचारबंदीची डोक्यावर टांगती तलवार असल्याने भाजीपाल्याची लागवड करायची की नाही अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडले आहेत.यंदा शेतकऱ्यांची भयंकर परिस्थिती होणार आहे. कारण नगदी पीक कांदा उत्पादन घटल्याने शेतकरी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे.- सचिन पाटील, शेतकरी, पाळे खुर्दपाणी असून शेतीत पिके घ्यावीत की नाही अशी चिंता शेतकरीवर्गाला सतावत आहे. कारण संचारबंदी अशीच चालू राहिली तर शेतमाल विकायचा कुठे?- जयदीप पाटील, शेतकरी, पाळे खुर्द.

 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा