शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

भावली विस्थापितांची मागणी झुगारून धरणाचे गेट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 8:08 PM

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली गावचे योग्य पुनर्वसन न करता, शासनाने यावर्षी धरण साठा पूर्णपणे करण्यासाठी गेट बंद केले आहे. यामुळे येत्या दोन दिवसात भावली गाव पाण्याखाली जाऊन ग्रामस्थांवर ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ येणार असल्याने बंद केलेले गेट तत्काळ उघडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाचे काम पंतप्रधान सिंचन योजनेतून दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. या धरणासाठी भावली गाव बुडीत क्षेत्रात गेले. या गावाच्या पुनर्वसनाचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांनी नियोजित ठिकाणी घरे बांधलेली नाहीत. यामुळे या धरणात पूर्ण पाणीसाठा करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी मे महिन्यातच शासनाकडे केली होती. मात्र शासनाने या मागणीची दखल न घेता पुनर्वसनाचे प्रलंबित कामे पूर्ण न करता सोमवारी या धरणाचे गेट बंद केले. दरम्यान, या बाबीची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या धरणाचे गेट तत्काळ उघडावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल पुरे व घोटी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या शिष्टमंडळात श्रमजीवीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, भास्कर पाचरणे, भगवान पाचरणे, सीताराम गावंडा, संपत काळचिडे, गणपत काळचिडे, त्र्यंबक खाडे,कचरू पाचरणे, दशरथ आघान, दत्तू खाडे, वाळू सराई आदींचा समावेश होता.

टॅग्स :Damधरण