शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

घटनाबाह्य धोरणांमुळे लोकशाही भयाखाली : उत्तम कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:32 IST

हा देश नेमका कोण चालवतो? हे समजण्यापलीकडे आहे. कारण सातत्याने या सरकारकडून घटनेविरुद्ध धोरणे आखून धार्मिक भावना ज्वलंत ठेवत धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाही भयाखाली सापडली आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

नाशिक : हा देश नेमका कोण चालवतो? हे समजण्यापलीकडे आहे. कारण सातत्याने या सरकारकडून घटनेविरुद्ध धोरणे आखून धार्मिक भावना ज्वलंत ठेवत धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाही भयाखाली सापडली आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले. गीताई फाउंडेशनच्या वतीने आयोजित शहीद गौरी लंकेश एल्गार पुरस्कार पत्रकार दीप्ती राऊत यांना बुधवारी (दि.२०) कांबळे व ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी कांबळे म्हणाले, आपल्या देशात भावना तीव्र अन् स्वस्त: केल्या जात असल्यामुळे माणसाचे जगणे मुश्कील होऊ लागले आहे. ज्या देशात ‘पवित्र’ गोष्टी अधिक वाढतात तो देश नेहमी मागासलेला राहतो, हे लक्षात घेता देशाच्या अशा बिकट आणि धर्मनिरपेक्षतेविरुद्ध तयार झालेल्या वातावरणात पत्रकारितेची जबाबदारी अधिक वाढल्याचे ते म्हणाले.  डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या करून विचार मारण्याचे प्रयत्न एकीकडे होत असताना या विचारांंना जिवंत ठेवत बळ देण्याचे काम गौरी लंकेश एल्गार पुरस्काराच्या माध्यमातून गीताई फाउंडेशनद्वारे केले जात असल्याचे गौरवोद्गार किरण अग्रवाल यांनी यावेळी काढले.  सार्वजनिक क्षेत्रात महिलांचा टक्का वाढावा, यासाठी समाजाने पूरक व्यवस्था उभी करण्याची अपेक्षा पुरस्कारार्थी दीप्ती राऊत यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आहिरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिता पगारे तर आभार कल्याणी आहिरे यांनी मानले. पत्रकारिता कसोटीच्या वळणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्याची गळचेपी होत असल्याने पत्रकारिता कसोटीच्या वळणावर आली आहे. महिलांनी या क्षेत्रात काम करणे अधिक जोखमीचे ठरू पाहत आहे. अशी जोखीम पत्करणार्‍या गौरी लंकेशची स्मृती जपून तिच्याच पावलावर पाऊल टाकून पत्रकारिता करणाºया दीप्ती राऊत यांना सन्मानित करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे किरण अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक