शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

डेंग्यूचा जोर ओसरला

By admin | Published: November 17, 2016 12:36 AM

थंडीत वाढ : धोकादायक शहरातून नाशिक बाहेर

नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने डेंग्यूचाही जोर ओसरत चालला असून शासनाने डेंग्यूबाबत जाहीर केलेल्या धोकादायक शहरांच्या यादीतून नाशिक बाहेर पडले आहे. आता राज्यातील मुंबई आणि पुणे या दोनच शहरांमध्ये डेंग्यूचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे सांगितले जात आहे.गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नाशिककरांना डेंग्यूच्या आजाराने पछाडले आहे. यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रामुख्याने जून ते आॅक्टोबर या कालावधीत रुग्णसंख्या जास्त होती. नाशिकसह राज्यभरात डेंग्यूने थैमान घातल्याने शासनाच्या आरोग्य विभागाने त्याची गंभीर दखल घेत विशेष कृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. डेंग्यूच्या आजारामुळे धोकादायक शहरांच्या यादीत नाशिकचाही समावेश होता. महापालिकेनेही वारंवार मोहिमा राबवून डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्याचे काम केले, परंतु डेंग्यूच्या आजाराची रुग्ण संख्या काही केल्या कमी होत नव्हती. महापालिकेने त्यासाठी पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारालाही जबाबदार ठरवत काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, महापालिकेकडून प्रयत्न सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही घट होताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये यावर्षी १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत २१६४ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी ८०९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. या महिन्यात दि. १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत १३४ संशयित रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ३४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)