शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नाशिक महापालिकेत बहुमत असूनही भाजप भीतीच्या छायेत

By किरण अग्रवाल | Updated: November 17, 2019 01:14 IST

राज्यातील सत्ता समीकरणात तोंड पोळू पाहत असल्याने भाजप आता कोणताच धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. अडीच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता हस्तगत करताना या पक्षाने मनसेला खिंडार पाडले होते. आता महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याच भीतीच्या छायेत हा पक्ष वावरताना दिसून येत आहे.

ठळक मुद्दे स्पष्ट बहुमत असतानाही आपल्याच नगरसेवकांवर एकप्रकारे अविश्वास महापौरपदाची निवडणूक येत्या २२ तारखेस ६६ पैकी केवळ ११ नगरसेवक खुद्द या पक्षाचे निष्ठावंत

सारांशस्वपक्षातील निष्ठावानांना दूर व उपेक्षित ठेवून परपक्षातून येणाऱ्या नवागंतुकांशी राजकीय चुंबाचुंबी करणे कसे अंगलट येऊ शकते याचा अनुभव राज्यात घेत असलेल्या भाजपला तशीच धास्ती नाशकातही सतावत आहे, म्हणूनच तर महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही आपल्याच नगरसेवकांवर एकप्रकारे अविश्वास दाखवित त्यांना महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनास धाडण्याची वेळ या पक्षावर ओढवली आहे.स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुस-यांच्या घरावर दगड मारायचे नसतात, हा तसा सामान्य संकेत. पण राजकारणात हे लक्षात कोण घेतो? त्यामुळे कोणत्याही निवडणुकांच्या काळात फोडाफोडीचे व आरोपांचे पीक अमाप येताना दिसते. यात कोणत्याही पक्षाचा अपवाद करता येऊ नये. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तर पक्षांतराचे प्रमाण इतके काही वाढले की मतदारांनाच त्याचा वीट आला आणि त्यांनी सत्तेसाठी कोलांटउड्या मारणा-या भल्याभल्यांचा ‘निकाल’ लावला. त्यामुळेच राज्यातील सत्तेचे त्रांगडे असे होऊन बसले की मुदत उलटूनही कुणास सत्तास्थापन करता न आल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली. यात ‘पुन्हा येईन’ म्हणणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप चांगलीच पोळली जाताना दिसत आहे. परिणामी, राज्यातील हा अनुभव लक्षात घेता आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बांधबंदिस्ती करणे या पक्षाला भाग पडले आहे.नाशिक महापालिकेतील सत्तेच्या दुस-या आवर्तनातील महापौरपदाची निवडणूक येत्या २२ तारखेस होऊ घातली आहे. परंतु यात स्पष्ट बहुमत असतानाही संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी भाजपला आपल्या नगरसेवकांना शहराबाहेर हलवावे लागले आहे. सत्ताधा-यांची यामागील भीतीची मानसिकता खूप काही सांगून जाणारी असली तरी, का ओढवली अशी परिस्थिती याचा विचार करता त्याचे मूळ या पक्षाच्याच पायाशी आढळून आल्याखेरीज राहत नाही. महापालिकेतील गेल्या पंचवार्षिकमधील ‘मनसे’च्या सत्तेला सुरुंग लावताना भाजपने मोठ्या प्रमाणात भरतीप्रक्रिया राबविली होती. स्वपक्षात अनेक पक्षनिष्ठ, प्रामाणिक व सक्षम उमेदवार असताना या बाहेरून आलेल्यांना तिकिटे दिली गेल्याने त्यावेळी तात्कालिक यश लाभून प्रथमच महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आलीही; परंतु आता पक्षांतर्गतची ही ‘बाह्य’ शक्तीच या पक्षाला भिवविणारी ठरली आहे.नाशिक महापालिकेतील भाजपच्या निवडून आलेल्या ६६ पैकी केवळ ११ नगरसेवक खुद्द या पक्षाचे निष्ठावंत आहेत. बाकी ८० टक्के सर्व उधार उसनवारीचे, परपक्षातून आलेले आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विषयांवर सत्ताधाºयांविरुद्ध स्वकीयच उभे राहिलेले पहावयास मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेऊनही पालिकेतील सत्ताधाºयांना आपले वेगळेपण प्रस्थापित करता आले नाही. नाशिक ही रामभूमी असल्याने महापालिकेतील कारभार जणू रामभरोसेच चालला. पण आता यापुढील उर्वरित कालावधीसाठीही तसेच घडून आले व पदाधिकारी निवड करताना योग्य निर्णय होऊ शकला नाही तर पुढच्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाणे अवघड ठरेल याची जाणीव भाजपला असावी. म्हणूनच कोणताही धोका न पत्करता त्यांनी स्वकीयांना बाहेर हलविण्याचा मार्ग पत्करलेला दिसतो.विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी डावलले गेलेले बाळासाहेब सानप व राज्यातील सत्तासमीकरणातून दुरावलेली शिवसेना, अशा दोघांना नाशकातील महापौरपद खुणावणारे आहे. सानप भाजपचे शहराध्यक्ष राहिले असताना त्यांच्या नेतृत्वात या पक्षाला महापालिकेत सत्ता मिळविता आली होती. त्यामुळे आता सानप यांच्यासाठी भाजपला आपले उपद्रवमूल्य दाखवून देतानाच, ते शिवसेनेत गेलेले असल्याने त्या पक्षात आपले उपयोगमूल्य दाखवून देणेही गरजेचे ठरले आहे. भाजपचे अवघे सहा नगरसेवक हाती लागले तरी महापालिकेतील सत्तांतर होऊ शकणारे आहे. त्यामुळे भाजपास वाटणारी भीती साधार ठरावी. या भीतीत भर घालणारी बाब म्हणजे, पर्यटनास जाण्यास सानप समर्थक काही नगरसेवकांनी नकार दिला आहे. भाजपने काल जे पेरले, तेच यानिमित्ताने आज उगविलेले दिसून येत आहे. उद्या महापौर निवडीप्रसंगी नेमके काय होईल ते दिसेलच; पण बहुमत असणाºया भाजपची आजची भागम्भाग ही त्यांचाच नाकर्तेपणा स्पष्ट करणारी ठरून जावी हे मात्र नक्की.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपाMNSमनसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBalasaheb Sanapबाळासाहेब सानप