शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

देवगाव : उत्पन्नात घट होण्याची भीती उन्हाच्या तडाख्याने द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:50 AM

देवगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल होतो. आता वाढत्या उन्हाच्या तडाख्यात द्राक्षबागा सापडल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्तवाढत्या उन्हापासून संरक्षण केले जात आहे

देवगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल होतो. आता वाढत्या उन्हाच्या तडाख्यात द्राक्षबागा सापडल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे. द्राक्ष काढणीचा हंगाम संपताच शेतकऱ्यांनी एप्रिल छाटणीला सुरुवात केली. या छाटण्याही पूर्ण झाल्या; परंतु त्यानंतर बागा फुटण्याच्या प्रतीक्षेत असतानाच वाढत्या उन्हामुळे त्याचा परिणाम द्राक्षवेलींवर होत आहे. शिवाय या फुटीमागे पुढे होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे शेतकरी वेगवेगळे उपाय करत आहेत. यामध्ये द्राक्षबागांत छाटणीनंतर टाकाऊ काड्या किंवा चिपाड, बारदानाचे आच्छादन तसेच मका कुट्टी, झाडांच्या बुडावर टाकून वाढत्या उन्हापासून संरक्षण केले जात आहे. तसेच ठिंबक सिंचनाद्वारे तसेच थंडावा मिळण्यासाठी संपूर्ण द्राक्षबागांना पाणी दिले जात आहे. सबकेन झालेल्या बागांना जो डोळा दिसत आहे तो कुठे एक डोळा, तर कुठे दोन डोळे अशी सध्या बागांची अवस्था झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात घट होते की काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून द्राक्षबागा धोक्यात येत असल्याने शेतकºयांना उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त करावा लागत आहे.याशिवाय वाढत्या उन्हामुळे शेतीची कामे मंदावली असल्याने मजुरांची टंचाई भासू लागली आहे. सध्या काड्यांची बांधणी, सबकेन, सेंद्रिय खते टाकणे ही कामे केली जात आहे. तसेच ही कामे सकाळी व सायंकाळी होत आहे. त्यामुळे मजूर मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे ही कामे शेतकºयांना घरीच करावी लागत आहे.