शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्टतील आमदारांची कार्यक्षमता संपली काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:57 IST

मुळात साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभव असलेल्या सावानाकडून राजकीय स्तरावरील अशा पुरस्कारांची योजनाच केली जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुरस्कार सुरू करण्यापूर्वीच होता. त्यातही, राजकीय स्तरावर दरवर्षी ‘आदर्श’ लोकप्रतिनिधी शोधणे जिकिरीचे बनणार असल्याची कल्पना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना आल्याने पुरस्काराचे नामाभिधान ‘आदर्श’ ऐवजी ‘कार्यक्षम’ आमदार पुरस्कार असे करण्यात आले होते.

नाशिक : मुळात साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभव असलेल्या सावानाकडून राजकीय स्तरावरील अशा पुरस्कारांची योजनाच केली जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुरस्कार सुरू करण्यापूर्वीच होता. त्यातही, राजकीय स्तरावर दरवर्षी ‘आदर्श’ लोकप्रतिनिधी शोधणे जिकिरीचे बनणार असल्याची कल्पना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना आल्याने पुरस्काराचे नामाभिधान ‘आदर्श’ ऐवजी ‘कार्यक्षम’ आमदार पुरस्कार असे करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार नेर्लीकर दाम्पत्याने दिलेल्या देणगीतून दिला जातो. स्वत: माधवराव हे पत्रकार आणि उत्तम लेखकही होते. त्यामुळे सावानाने या पुरस्कार आयोजनाचे पालकत्व स्वीकारले आणि आतापर्यंत १७ आमदारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्टÑ विधानसभा आणि विधान परिषदेतील कार्यक्षम व उल्लेखनिय कामगिरी बजावणाºया आमदारांना हा पुरस्कार दिला जातो. मात्र, १७ वर्षांतच हा पुरस्कारराज्यस्तराऐवजी राष्टय स्तरावर देण्याची कल्पना कुठून आणि कोणाच्या सुपीक डोक्यातून अवतरली, हा मनोरंजनाचाच भाग ठरावा. महाराष्टÑ विधानसभेचे २८८ आणि विधानपरिषदेचे ७८ आमदार आहेत. दर पाच वर्षांनी होणाºया निवडणुकांमुळे दोन्ही सभागृहात अनेक नवे चेहरे येत असतात. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार महाराष्टÑात प्रतिष्ठेचा मानला जातो. हा पुरस्कार आपल्याला मिळावा, यासाठी राज्यभरातील आमदारांना अपेक्षा असते. पुरस्कारासाठी नियुक्त निवड समितीला राज्यभरात कोणता आमदार कसे काम करतो, याची ढोबळस्वरूपात माहिती असते आणि त्यासंबंधीच्या अधिकच्या प्रतिक्रियाही तेथील मतदारांकडून जाणून घेतल्या जातात. मात्र, आता या पुरस्काराचे स्वरूप राष्टÑीय केल्याने आणि त्यात आमदारांबरोबरच खासदारही घुसविल्याने हा पुरस्कार देताना निवड समितीची डोकेदुखी वाढणार आहे. मुळातच तेलंगणा, छत्तीसगढ अथवा मिझोरामच्या आमदार-खासदारास या पुरस्काराने सन्मानित करताना महत्त्व नेमके कुणाचे वाढणार, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पुरस्काराची व्याप्ती वाढविल्याने यापुढे हा पुरस्कार महाराष्टÑाबाहेरील खासदार-आमदार यांनाच दिला जाण्याची शक्यता वाढल्याने महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. त्यातही महाराष्टÑातील लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता संपुष्टात आली काय, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.सावानात काही लोकांना अनपेक्षित अशी पदे मिळाल्याने त्यांच्याकडून नावीन्याच्या ध्यासापोटी यासारखे अनाकलनीय निर्णय घेतले जाऊ लागल्याने त्यांचे स्वागत होण्याऐवजी ते हास्यास्पदच अधिक ठरू लागले आहेत.राज्यस्तराऐवजी राष्टय स्तरावर देण्याची कल्पना कुठून आणि कोणाच्या सुपीक डोक्यातून अवतरली, हा मनोरंजनाचाच भाग ठरावा. महाराष्टÑ विधानसभेचे २८८ आणि विधानपरिषदेचे ७८ आमदार आहेत. दर पाच वर्षांनी होणाºया निवडणुकांमुळे दोन्ही सभागृहात अनेक नवे चेहरे येत असतात. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार महाराष्टÑात प्रतिष्ठेचा मानला जातो. हा पुरस्कार आपल्याला मिळावा, यासाठी राज्यभरातील आमदारांना अपेक्षा असते. पुरस्कारासाठी नियुक्त निवड समितीला राज्यभरात कोणता आमदार कसे काम करतो, याची ढोबळस्वरूपात माहिती असते आणि त्यासंबंधीच्या अधिकच्या प्रतिक्रियाही तेथील मतदारांकडून जाणून घेतल्या जातात. मात्र, आता या पुरस्काराचे स्वरूप राष्टÑीय केल्याने आणि त्यात आमदारांबरोबरच खासदारही घुसविल्याने हा पुरस्कार देताना निवड समितीची डोकेदुखी वाढणार आहे. मुळातच तेलंगणा, छत्तीसगढ अथवा मिझोरामच्या आमदार-खासदारास या पुरस्काराने सन्मानित करताना महत्त्व नेमके कुणाचे वाढणार, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पुरस्काराची व्याप्ती वाढविल्याने यापुढे हा पुरस्कार महाराष्टÑाबाहेरील खासदार-आमदार यांनाच दिला जाण्याची शक्यता वाढल्याने महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. त्यातही महाराष्टÑातील लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता संपुष्टात आली काय, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.सावानात काही लोकांना अनपेक्षित अशी पदे मिळाल्याने त्यांच्याकडून नावीन्याच्या ध्यासापोटी यासारखे अनाकलनीय निर्णय घेतले जाऊ लागल्याने त्यांचे स्वागत होण्याऐवजी ते हास्यास्पदच अधिक ठरू लागले आहेत.

टॅग्स :libraryवाचनालयMLAआमदार