शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

कौमार्य चाचणी प्रकरणी महिला आयोगाने मागितला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 01:40 IST

एका विशिष्ट समाजातील उच्चभ्रू कुटुंबीयांकडून त्र्यंबकेश्वर येथील एका रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या साेहळ्यापूर्वी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरेनुसार जात पंचायतीच्या दबावाखाली डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी होणार असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्राप्त झाली होती. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशान्वये उपसचिवांनी साधार स्पष्टीकरण करणारा अहवाल सादर करण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देअंनिसकडून तक्रार : ग्रामीण पोलीस कळविणार माहिती

नाशिक : एका विशिष्ट समाजातील उच्चभ्रू कुटुंबीयांकडून त्र्यंबकेश्वर येथील एका रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या साेहळ्यापूर्वी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरेनुसार जात पंचायतीच्या दबावाखाली डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी होणार असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्राप्त झाली होती. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशान्वये उपसचिवांनी साधार स्पष्टीकरण करणारा अहवाल सादर करण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र पाठविले आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील एका रिसॉर्टमध्ये रविवारी (दि.२१) पार पडलेल्या लग्नानंतर नववधूला कौमार्य चाचणीची ‘परीक्षा’ द्यावी लागणार असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) लेखी स्वरूपात प्राप्त झाली होती. यानुसार पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे गाठून याबाबत शहनिशा करून अशाप्रकारची अन्यायकारक कुप्रथा थांबविण्याची मागणी केली होती. यानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या पथकासह घटनास्थळ गाठून तेथील विवाहसोहळ्याशी संबंधित कुटुंबीयांकडे चौकशी केली. यावेळी संबंधितांकडून लेखी जबाब घेतले गेले. यावेळी जात पंचायतींच्या पंचांनी कानावर हात ठेवत अशी कौमार्य चाचणी होत नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कायद्याची जाणीव करून दिल्यावर अशी कौमार्य परीक्षा होत नसल्याचे व करणार नसल्याचे लेखी लिहून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, याबाबत चाकणकर यांनी मंगळवारी (दि.२३) ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करत ‘कौमार्य चाचणी’ची बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले आहे. याबाबत साधार स्पष्टीकरण करणारा सद्यस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोग कायद्यानुसार पाठविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

--कोट--

त्र्यंबकेश्वर पोलिसांना प्राप्त झालेल्या निवेदनानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केलेली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून तपासणी अहवाल अधीक्षक कार्यालयाला मिळालेला आहे. तसेच आमच्या गोपनीय विभागाच्या पथकानेही लग्नाच्या एक दिवसाच्या अगोदर पासूनचे रिसॉर्टमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले आहे. पोलीस या लग्नसोहळ्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून होते. तेथे कौमार्य चाचणीसारखी कुप्रथा पार पडलेली नाही. तपासणी रिपोर्टनुसार महिला आयोगाकडे सविस्तर अहवाल सादर करणार आहोत.

- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस