शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
3
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
4
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
5
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
6
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
7
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
8
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
9
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
10
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
11
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
12
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
13
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
14
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
15
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
16
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
17
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
18
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
19
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
20
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू

नैराश्यमुक्तीसाठी चर्चा आवश्यक : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:49 AM

काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वत:च्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल निरुत्साह यासाठी नैराश्य आलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्त्ािंसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.

नाशिक : काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वत:च्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल निरुत्साह यासाठी नैराश्य आलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्त्ािंसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.नाशिक सायक्रियास्ट्रिक सोसायटीतर्फे शनिवारी (दि.२३) कुसुमाग्रज स्मारकात ‘डिप्रेशन : समज व गैरसमज’ याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नैराश्य येण्याची कारणे व त्याविषयी करण्यात येणाऱ्या उपायांविषयी मार्गदर्शन केले. नेहमी ज्या गोष्टी करतो त्याविषयी रुची नसणे, मनात आत्महत्येचे विचार येणे यामुळे नैराश्य अजूनच बळावतो. तसेच नैराश्य आलेल्या व्यक्ंितनी आपल्या जवळच्या व्यक्तिंच्या सहवासात राहणे आवश्यक आहे. लहानसहान घटना मनाला लावून घेणे, बदलत्या काळासोबत स्वत:ला बदलण्याची तयारी नसणे व त्यातून आलेले वैफल्य, रिकाम्या वेळाचा वापर कसा करायचा हे न कळल्यामुळे मनाचा हट्टीपणा या आणि अशा अनेक गोष्टी नैराश्याची भावना घट्ट करत जाऊ शकतात. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी अशा व्यक्तीने बोलून मनमोकळे करणे आवश्यक आहे.तसेच त्या व्यक्ंितच्या जवळच्या माणसांनीही त्याला आधार देऊन त्याला समजून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी आयोजक गिरीश पगारे, राजीव ठाकरे, अभिजीत पाटील, शिरीष सहस्त्रबुद्धे, अशोक पवार, पा. भा. करंजकर आदी उपस्थित होते.ही आहेत लक्षणेएखाद्याला नैराश्य येण्याचे प्रमुख लक्षणांमध्ये त्या व्यक्तीला थकवा येणे, निरुत्साह वाटणे, भूक कमी किंवा जास्त लागणे, उदास वाटणे, चिडचिड होणे, झोप कमी किंवा जास्त येणे, आत्मविश्वास गमावणे, चुका करण्याची भीती वाटणे, कामात लक्ष न लागणे, निर्णयक्षमता गमावणे तसेच प्रमुख लक्षणे म्हणजे मनात आत्महत्येचा विचार येणे असे लक्षणे नैराश्य आलेल्या व्यक्तीला येत असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक