शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

मजुरांचे विदारक पद्धतीने स्थलांतर सरकारला अशोभनीय : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 10:03 PM

नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे.

नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपण कोणावर टीका करत नाही. मात्र, त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा देणे आवश्यक असल्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. लॉकडाउन हाच कोरोनाच्या विरोधातील अंतिम उपाय नाही. कारण त्यामुळे आता मुंबईसह अन्यत्र उद्योग धंदे सुरू होणारच नाही या समजातून ते निघाले आहेत, असेही मत भुजबळ यांनी व्यक्त केले.गुरुवारी (दि.७) प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. मुळातच पंतप्रधानांनी एका रात्रीत लॉकडाउन जाहीर करणे चुकीचे होते. किमान दोन ते तीन दिवस वेळ दिला असता तर कामगारांना आपल्या गावी जाता आले असते आणि उद्योग व्यावसायिकांनादेखील आश्वस्त करता आले असते, परंतु एकाएकी हा निर्णय जाहीर करण्यात आला, अशी केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. राज्यातील कामगार आणि मजूर हवालदिल झाले आहेत. त्यांना आता घराची ओढ लागली असल्याने ते घराकडे निघाले आहेत. त्यांना राज्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी सोय करून दिली असती तर योग्य ठरले असते. आज बस किंवा अन्य साधने नसल्याने ते पायी जाताना अनेक गावांत थांबतात, भोजन करून पुन्हा निघतात, त्यामुळे संसर्ग वाढू शकत नाही काय असा प्रश्न करीत भुजबळ यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाला वाचा फोडली होती, असेही सांगितले.राज्यातून अशाप्रकारे जाणारे मजूर हे भलेही या राज्याचे नागरिक नसले तरी देशाचे तर नागरिक आहेत ना, मग त्यांची जबाबदारी कशी टाळता येईल, असा प्रश्न त्यांनी केला. वारंवार बदलणाऱ्या आदेशांमुळे गोंधळाचे वातावरण आहे, असे सांगतानाच त्यांनी कोरोनाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित लढायचे आहे, असेही सांगितले.-------------शासकीय अधिकाऱ्यांतील विसंवादशासकीय अधिका-यांमध्ये असलेल्या विसंवादावर टीका करताना भुजबळ यांनी जिल्हाधिकारी दुकाने उघडी करण्यास सांगतात आणि पोलीस दुकाने बंद करायला सांगतात हे बरोबर नाही. वेळेची मर्यादा दुकानांना देणे म्हणजे गर्दी करण्यास निमंत्रण देण्यासारखे आहे. ही संचारबंदी आजाराच्या विरोधात आहे, जातीय दंगलीसाठी नाही असे सांगून त्यांनी प्रशासकीय घोळाबद्दल नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिक