शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला

By admin | Published: February 02, 2015 12:44 AM

मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला

नाशिक : ‘माझ्या हाती सत्ता द्या, मी शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवतो’, असे आवाहन करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेत सत्तेची फळे तीन वर्षे चाखली; परंतु ज्यांच्या हाती नवनिर्माणाची सूत्रे सोपविली त्या महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या कचखाऊ भूमिकेमुळे सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला असून, ठाकरी धाक गायब झाल्याची भावना बोलून दाखविली जात आहे. त्यातच महापालिका मुख्यालयात महापौर हजेरी लावत नसल्याने पालिकेत गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या नागरिकांचा ओघ उपमहापौर आणि आयुक्तांकडे वाढू लागला आहे. नाशिककरांनी ४० नगरसेवक निवडून देत राज ठाकरे यांच्या हाती महापालिका सुपूर्द केली, परंतु पहिल्या अडीच वर्षांत महापौरांसह पदाधिकाऱ्यांना अपेक्षित असा प्रभाव न टाकता आल्याने मनसेवर चोहोबाजूने टीका झाली. लोकसभा-विधानसभा निवडणुकीतही विरोधकांनी राज्यभर प्रचारसभांमधून नाशिक महापालिकेतील मनसेच्या अपयशाचे पाढे वाचले. परिणामी, मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सप्टेंबर २०१४ मध्ये पुन्हा एकदा झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा टेकू घेऊन राज ठाकरे यांनी पालिकेत मनसेचाच महापौर विराजमान केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी दोन-तीन वेळा नाशिक दौरे करत कामांना चालना देण्याचाही प्रयत्न केला. परंतु महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या मनसेमध्येच आता विसंवादाचे सूर उमटू लागले असून, प्रभागांमध्ये कामे होत नसल्याची ओरड करण्यात सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक आघाडीवर आहेत. महासभांमध्येही सत्ताधाऱ्यांतूनच महापौरांना आव्हान देण्याचे प्रयत्न होत आहेत. मनसेतील अंतर्गत कारभाराला आणि राजकारणाला कंटाळूनच इंदिरानगर भागातील नगरसेवक सतीश सोनवणे यांनी भाजपाची वाट धरली, तर माजी आमदार वसंत गिते यांच्या भाजपातील प्रवेशानंतर आणखी काही नगरसेवक पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसेने पहिल्या अडीच वर्षांत मौनी महापौर बसविल्यानंतर आताही विद्यमान महापौरांबद्दल तेच विशेषण लावले जाऊ लागले असून, महापौर मुख्यालयात भेटत नसल्याची तक्रार नगरसेवकांबरोबर नागरिकांकडूनही होत आहे. महापौरांच्या कक्षात अंधार दाटला असतानाच लगतच्या उपमहापौरांच्या कक्षात मात्र नागरिक व लोकप्रतिनिधींचा राबता सुरू असतो. आयुक्तही व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढत अभ्यागतांसाठी वेळ देत असल्याने तिथेही गर्दीचा माहोल असतो. राज ठाकरे यांनी नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधा आणि संपर्क वाढवा, असा कानमंत्र देऊनही विद्यमान महापौरांसह पदाधिकारी मात्र ढिम्म असून, त्याचा फायदा विरोधक उचलत आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांवर असलेला ठाकरी धाकच गायब झाल्याची भावना खुद्द मनसेतील काही सदस्यच बोलून दाखवत आहेत. (प्रतिनिधी)