शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

ग्रामसभेच्या माहितीबाबत उदासीनता

By admin | Published: February 01, 2016 10:13 PM

कळवण : ७१ ग्रामपंचायतींनी माहिती दिली नसल्याचे उघड

कळवण : २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेल्या विषयांबाबत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत मार्गदर्शन करून १ ते १६ विषय चर्चेत घेऊन ग्रामसभा झाल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत इतिवृत्त व त्याची माहिती, झालेले ठराव तत्परतेने पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाला सादर करणे बंधनकारक केले होते; मात्र आठवडा उलटूनही तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींनी माहिती सादर केली नसल्याची बाब समोर आली आहे.सात दिवसांत फक्त १५ ग्रामपंचायतींनी कळवण पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात माहिती सादर केली असल्याचे समोर आले आहे. येत्या ३ ते ४ दिवसात उर्वरित ग्रामपंचायतीची माहिती मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. मात्र ग्रामसभेच्या माहितीबाबत असलेली उदासीनता समोर आली आहे.पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याचे आणि तसा अहवाल पाठविण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी पत्रही पाठविले होते. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रथम नागरिक म्हणून ग्रामसभा यशस्वी करण्याच्या दृष्टीने सरपंच यांच्या उपस्थितीत ग्रामसभा १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा शासकीय यंत्रणेने केला असून प्रत्यक्षात ग्रामसभा घेताना नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर) अनेक योजना ,शासनाचा निधी ,याची माहिती ग्रामस्थपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा केला जात असून, ग्रामसभांमध्ये शासनाच्या योजनाची माहिती तसेच इतर माहिती ग्रामस्थांना दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. कळवण पंचायत समितीच्या दप्तरी मात्र कळवण तालुक्यात १०० टक्के ग्रामसभा झाल्याची नोंद आहे. (वार्ताहर)