शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
3
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
4
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
5
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."
7
Oral cancer चे निदान टूथब्रशद्वारे लागणार, IIT Kanpur मध्ये बनवलेले डिव्हाईस लवकरच बाजारात येणार!
8
नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा
9
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
10
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा
11
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
12
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
13
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
14
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
15
"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार
16
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
17
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
18
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
19
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
20
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

विभागातील पाच ग्रामपंचायतींना ‘माझी वसुंधरा’चे चार कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:11 AM

गेल्यावर्षी २ ऑक्टोबर ते १५ एप्रिल २०२१ या दरम्यान राज्यपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले होते. ...

गेल्यावर्षी २ ऑक्टोबर ते १५ एप्रिल २०२१ या दरम्यान राज्यपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले होते. त्यात पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वाचा आधार त्यासाठी घेण्यात आला होता. पर्यावरणाचे रक्षण हाच त्यामागचा हेतू असल्याने महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवर हे अभियान राबविण्यात आले असता, त्याचे गुणांकन करून स्पर्धेतील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. जागतिक पर्यावरणदिनी ५ जून रोजी शासनाने हे पुरस्कार जाहीर केले असता, त्यात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ही ग्रामपंचायत राज्यात प्रथम, तर मिरगाव ता. कर्जत (नगर) ही ग्रामपंचायत द्वितीय, चिनावल, ता. रावेर (जळगाव) ही ग्रामपंचायत तृतीय व पहुरपेठ (जळगाव) लोणी बु. (नगर) या दोन्ही ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या ग्रामपंचायतींला दीड कोटी, द्वितीयला एक कोटी व उर्वरित ग्रामपंचायतींना प्रत्येकी पन्नास लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

या निधीच्या खर्चाचेही मार्गदर्शन शासनाने केले असून, त्यात प्रामुख्याने गावाचे हरित अच्छादन वाढविणे, वृक्षारोपण करणे, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्राचे संवर्धन व देखभाल करणे, रोपवाटिकांचे निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाले यांचे पुनर्जीवीकरण करणे, सौरऊर्जा, विद्युत वाहनांना प्रोत्साहन देणे आदी उपक्रमावर सदरची रक्कम खर्च करण्यात यावे असेही नमूद करण्यात आले असून, या रकमेतून घेण्यात आलेली कामे येत्या १२ महिन्यात पूर्ण करण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.