शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

निराधार विद्यार्थ्यांना सक्षम करणार ‘दिव्य नवचेतना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:11 AM

नाशिक : जीवघेण्या कोविड संकटात माता-पिता अथवा दोहोंपैकी एकास गमावलेल्या बालकांना मदतीचा हात देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरातील ...

नाशिक : जीवघेण्या कोविड संकटात माता-पिता अथवा दोहोंपैकी एकास गमावलेल्या बालकांना मदतीचा हात देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनी एकत्र येत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापासून ते त्यांना स्वावलंबी करण्याचा विडा उचलत त्यांच्यात नवचेतना जगवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील ८० मुलांचे पालकत्व स्वीकारत ‘दिव्य चेतना सोशल फाउंडेशन’तर्फे नाशिकमध्ये रविवारी (दि.२७) ‘नवचेतना संकल्प’ उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १५ मुलांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी खा. हेमंत गोडसे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आदी उपस्थित होते.

कोरोना संकटात अनेक बालकांनी माता-पिता तर काहींनी दोघांपैकी एकाचा आधार गमावला आहे. ही बाब लक्षात घेत दिव्य चेतना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या बालकांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलतानाच त्यांना कौशल्यनिपुण करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमात भारतीय जैन फाउंडेशन, गुंज फाउंडेशन, तनिष्का, राऊंड टेबल-१०७ आणि लेडीज सर्कल-११९ या सामाजिक संस्थांचेही योगदान असणार आहे. पालक गमावलेल्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना आर्थिक साहाय्य दिले जाणार असून यात प्रामुख्याने शाळेची फी, स्टेशनरी, युनिफॉर्म यांचा समावेश आहे. या उपक्रमातून निराधार विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, कांता राठी, प्राचार्य प्रशांत पाटील, राजेश कोठावदे, घनश्याम येवला, जया पटेल, विजय बाविस्कर, अरविंद महापात्रा, हेमंत राठी, गौरव ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.