शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

बापरे! ...अन्यथा तुमचं कासव प्रेम ठरेल गंभीर गुन्हा; जाणून घ्या, काय आहे कायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:05 IST

नाशिक - नाशिक शहर आणि बहुतांश परिसरात नागरिक घरामध्ये अथवा दुकानात विविध प्रजातीचे कासव पाळतात. कासव हा पाळीव प्राणी असल्याचं ...

नाशिक - नाशिक शहर आणि बहुतांश परिसरात नागरिक घरामध्ये अथवा दुकानात विविध प्रजातीचे कासव पाळतात. कासव हा पाळीव प्राणी असल्याचं समजलं जातं. पण कासवांच्या बहुतांश प्रजाती असून काही विदेशी प्रजातींसह अन्य प्रजाती पाळणे वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा देखील ठरतो. यामुळे त्याबाबतची माहिती करून घ्यावी. अन्यथा तुमचं कासव प्रेम हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. 

काय आहे कायदा...?

भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा१९७२अंतर्गत अनुसूची १ ते ४ मध्ये समाविष्ट होणारे कुठलेही वन्यजीव कोणत्याही उद्देशाने जवळ बाळगणे गुन्हा ठरतो. त्यानुसार वन किंवा वन्यजीव विभागाकडून कारवाईदेखील केली जाते. कासवांच्या बहुतांश प्रजाती या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत; मात्र त्याविषयीची माहिती नसल्यामुळे कासव पाळण्याचा छंद हा अडचणीत आणू शकतो.

कासवांच्या या प्रजाती पाळू नयेत

भारतीय वन्यजीव संस्थानकडून कासवांच्या काही प्रजातींविषयीची माहिती देण्यात आली आहेत. या प्रजाती कोणताही व्यक्ती स्वत:जवळ कायद्याने बाळगू शकत नाही. बहुतांश कासव प्रजाती या इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या लाल यादीत तसेच चिंताजनक, धोकादायक स्थितीत अशा वर्गवारीत समाविष्ट आहेत.

अनुसूची-१ मधील कासवांच्या प्रजाती

१) भारतीय मृदू कवचाची कासव

२)आसाम रुफ टर्टल

३) कोचिन फॉरेस्ट केन टर्टल

४) इंडियन फ्लॅपशेल टर्टल

५) इंडियन लीफ टर्टल

६) इंडियन पिकॉक सॉफ्टशेल टर्टल

७), इंडियन रुफ टर्टल आदी.

कासवांना वन्यजीव कायद्याचे ‘संरक्षण’

कासवांच्या सर्वच प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संरक्षित आहेत. त्यामुळे कासव कुठल्याही उद्देशने पकडणे, विकणे किंवा विकत घेणे आणि पाळणे बेकायदेशीर ठरते. वाढते जल प्रदूषण आणि कासवांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत असल्यामुळे दिवसेंदिवस कासवांची संख्या कमी होत चालली आहे. नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाची भूमिका बजावणारे कासव नाहीसे झाल्यास त्याचे मोठे गंभीर परिणाम पृथ्वीतलावर बघावयास मिळू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तस्करीचा मोठा धोका

जंगलातील तलावांमध्येसुद्धा कासवांची संख्या घटू लागली आहे. कारण कासवांच्या तस्करीचे प्रमाण हे वाढू लागले आहे. उत्तरप्रदेश राज्य हे कासवांच्या तस्करीचे केंद्र समजले जाते. महाराष्ट्र आणि बंगालमधून सॉफ्टशेल टर्टल, कर्नाटकमधून अंदनी कासव अशा विविध राज्यांतून विविध प्रजातीच्या कासवांची तस्करी उत्तर प्रदेशच्या दिशेने केली जाते.

 

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentपर्यावरण