शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

दुष्काळी परिस्थितीमुळे मिळेना जनावरांना चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:17 IST

मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फिटल्याने जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, अशी दाहकता बऱ्याच शेतकºयांना लागली आहे.

ठळक मुद्देजनावरे स्वस्तात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फिटल्याने जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, अशी दाहकता बऱ्याच शेतकºयांना लागली आहे.अजून एक महिनाभर पुरेल एवढाच चारा उपलब्ध असून, पुढचे ५ ते ७ महिने काढायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकरी बाळासाहेब वावधाने यांचे मनेगाव येथील पाहुणे तानाजी शिंदे यांना ट्रॅक्टरद्वारे १ ट्रॉली मक्याच्या चाºयाची कुट्टी नेण्यासाठी सुमारे ७० किलोमीटर अंतर जाण्यासाठी तयारी करीत आहेत. या १ ट्रॉली चाºयाची सध्याची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. गत महिन्यात मोठ्या प्रमाणात चाºयाची विक्र ी चढ्या दराने करण्यात आली होती.दुसºया जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील शेतकºयांनी येवला तालुक्यातील पश्चिम भागातून चारा वाहतूक केली आहे. आता नवीन चारा करायचा म्हटल्यावर पाण्याचा प्रश्न पुन्हा शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. कारण मे महिन्यापासून केवळ कडक उन्हाची तीव्रता सोसत असलेल्या मानोरी बुद्रुक, देशमाने, खडकीमाळ, मुखेड, मुखेड फाटा आदी भागात विहीर, बोअरवेल यांनी केव्हाच तळ गाठला असल्याने नवीन चाºयाच्या पिकाला पाणी द्यायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येवला तालुक्यातील ५ मंडळात शासनाने दुष्काळी परिस्थिती असल्याची घोषणा १ महिनाभरापूर्वीच केली असून, अद्याप कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा दुष्काळी उपाययोजना केल्या नाही. शासनाने केवळ दुष्काळाची घोषणा न करता दुष्काळ निवारण करण्याची तसेच मागणी शेतकºयांकडून होत आहे.दुष्काळग्रस्त भागात शासनाने प्रामुख्याने जनावरांच्या चारा छावण्या तत्काळ सुरू करण्याची गरज आहे. चारा छावण्या तत्काळ सुरू न केल्यास महागडी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.- बाळासाहेब वावधाने, शेतकरी