शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

आठ वारसांनी कोविडचे ५० हजार केले परत! ६३ जणांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 5:13 AM

इतरांचा मिळेना प्रतिसाद : अजूनही ६३ जणांची प्रतीक्षा

नाशिक : कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या ५० हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदान वितरणात गोंधळ होऊन ७१ वारसदारांच्या खात्यात दोनदा रक्कम जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर प्रशासनाने जादाचे अनुदान परत घेण्याची कार्यवाही सुरू केली असून, आत्तापर्यंत केवळ ८ जणांनीच प्रामाणिकपणे ५० हजार रुपये परत केले आहेत. उर्वरित ६३ जण मात्र पुरेसा प्रतिसाद देत नसल्याने संबंधितांना नोटीस पाठविली जाण्याची शक्यता आहे.

कोविडमुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील एका वारसाला ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जात असताना ७१ वारसांच्या खात्यात मात्र दोनदा ५० हजार रुपये जमा झाल्याची बाब समोर आली होती. संबंधितांना गेलेली अतिरिक्त रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, त्याला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाकडून पुन्हा एकदा संबंधितांना स्मरणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते, असे संबंधितांनी सांगितले.

कोविडमुळे मृत्यू ओढावल्याने संबंधित कुटुंबियांवर मोठा आघात झालाच, शिवाय घरातील व्यक्ती गेल्याने मोठे आर्थिक संकटही उभे राहिले. राज्यभरातून अशा व्यथा समोर आल्याने कोविडच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापासून वारसांना दिलासा मिळावा, यासाठी आपत्ती विभागाने वारसांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रणाखाली सानुग्रह अनुदानाचे वितरण केले जात आहे. आत्तापर्यंत सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक वारसांच्या खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून पात्र ठरलेल्या वारसांच्या खात्यात ५० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. मात्र, ७१ वारसांच्या खात्यात दोनदा अनुदान जमा झाल्याची बाब उघडकीस आली. त्यामध्ये नाशिक शहरातील ५२, ग्रामीण भागातील १२ तर मालेगाव महापालिका हद्दीतील ७ वारसांचा समावेश आहे.

त्रुटींचाही घेतला जाणार शोध

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. त्यामुळे घरातील दोघांचा मृत्यू झाला असेल तर प्रत्येकी ५० हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये मिळू शकतात. अशा वारसदारांची नावेही दुबार यादीत असण्याची शक्यता असल्यामुळे संबंधितांशी संपर्क करून तशी माहिती देखील घेतली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल