शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:54 AM

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी जिल्ह्णातील आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची जोरदार मागणी केली. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनांच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, त्याच गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासल्यामुळे केलेला खर्च वाया गेला असून, अलीकडेच या योजनेसाठी नव्याने काढण्यात आलेला आदेशही बदलण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, निर्मला गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला. झिरवाळ यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी गावांची निवड केली जाते परंतु नाशिक जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरी व कळवण या भागांची एकूणच भौगोलिक परिस्थिती पाहता याठिकाणी सिमेंटचे बंधारे बांधण्याजोगी भौगोलिक परिस्थिती नाही, त्यामुळे तेथे माती बंधारे योग्य आहेत परंतु अशा प्रकारची कामे करण्यास अधिकारी उत्सुक नाहीत. जलयुक्त शिवार योजनेची कामे सीएसआरमधून केली जातात, त्यासाठी निधीही खर्च केला जातो; मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. या कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतल्यास त्याचा उपयोग होईल, असे सांगितले. आमदार निर्मला गावित यांनी जलयुक्तच्या निकषांमुळे आदिवासी भागातील गावे, पाड्यांंवर कामे होत नाही.गेल्या वर्षात त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात काय कामे झाली याची माहिती अद्यापही आपल्याला दिली गेली नसल्याची तक्रार केली. जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलावेत यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार जिवा पांडू गावित यांनी, जिल्ह्णातील पश्चिम भाग खडकाळ व चढउताराचा असल्यामुळे या ठिकाणी जलयुक्तची कामे करूनही उपयोग नाही. जलयुक्तमध्ये एरिया ट्रीटमेंटला अधिक महत्त्व देण्यात आले असून, राज्यातील सपाट भूभागाचा विचार करून या योजनेचे निकष ठरविण्यात आले आहेत; मात्र जे भाग डोंगराळ व चढउताराचे आहेत तेथे ही योजना कशी राबविणार? असा सवाल त्यांनी केला. नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अलीकडेच २३ जून रोजी जलयुक्त शिवार योजनेबाबत नवीन आदेश काढला आहे. त्या आदेशातील निकष व नियम पाहता आदिवासी भागात एकही काम होऊ शकणार नाही, त्यामुळे हा आदेश बदलण्यात यावा अशी मागणी केली. ज्या गावांमध्ये कामे केली तेथेच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.