नाशिक : शहरातील सर्वांत गजबजलेला परिसर म्हणजे महामार्ग बसस्थानक. या स्थानकाच्या समोरच उभ्या राहणाऱ्या खासगी बसेस, रिक्षा-टॅक्सी थांबा आणि हातगाडी विक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे सदर रस्ता धोकादायक बनला आहे. येथील हॉटेल्स आणि दवाखान्यांमध्ये येणारे लोक आपली वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडते. पालिकेने महामार्ग स्थानकासमोरील अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न करूनही परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमण हटविले होते; परंतु विक्रेत्यांनी पुन्हा एकदा महामार्ग स्थानकाला विळखा घातल्याने या ठिकाणी जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग बसस्थानकावरून मुंबई, कसारा, नगर, शेवगाव, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, शिरूर या बसेस सोडल्या जातात. त्यामुळे या स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मुंबई नाका हा शहरातील वर्दळीचा चौक असून, दररोज हजारो वाहने येथून ये-जा करीत असतात. (प्रतिनिधी)
महामार्ग बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा
By admin | Published: November 17, 2016 10:32 PM