शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अतिमहत्त्वाकांक्षा वाईट मार्ग दाखविते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:02 IST

महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला.

नाशिक : महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला.ओम साई श्री सच्चिदानंद बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. सोनाली कुलकर्णी-गायकवाड लिखित व अरुण भावसार दिग्दर्शित ‘अश्वमेध’ नाटक परशुराम साईखेडकर सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत सादर करण्यात आले. हे एक काल्पनिक नाटक असून ‘निषाद’ साम्राज्याची महाराणी नीलाक्षी महत्त्वाकांक्षी असते; मात्र तिच्याकडून महत्त्वाकांक्षेचा अतिरेक होतो याभोवती ‘अश्वमेध’चे कथानक फिरत जाते. नीलाक्षीला पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे राजा तिच्यावर नाराज असतो.त्यामुळे नीलाक्षी वैद्याकडून तपासणी करून घेते. अपत्यप्राप्तीसाठी गर्भाशय योग्य असल्याचे वैद्य सांगतात. त्यामुळे नीलाक्षी जास्त महत्त्वाकांक्षी बनते. अश्वसहायक अश्विनद्वारे ती मातृत्व प्राप्त करून घेत राजा कृतसेनचा अश्विनच्या माध्यमातून विष देऊन खून करते. त्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात अश्विनचाही ती बळी देते. महापराक्रमी सम्राज्ञी महाराणी बनण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न नीलाक्षी पूर्ण करते. या नाटकात डॉ. सोनाली कुलकर्णी, आदित्य भोंबे, श्रुती कापसे, हरिकृष्ण डिडवाणी, राहुल काकड, मदुरा सोनवणे, सचिन दलाल, हरीश परदेशी, राजेश टाकेकण यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य अविनाश देशपांडे यांचे तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक