शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गुजरातहून दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी

By दिनेश पाठक | Updated: April 25, 2024 22:33 IST

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दिनेश पाठक, नाशिक: कांदा पट्टा असलेल्या नाशिकसह राज्यभरात कांदा निर्यातबंदीवरून रान उठले असताना गुजरातहून मात्र दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस केंद्र सरकारच्या वाणिज्य व परकीय व्यापार विभागाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी परवानगी दिली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धुराळ्यात विराेधकांना सरकारवर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळाले असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकार अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गुजरातचे लाड पुरवित असल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. गेल्या आठ डिसेंबरपासून कांद्याची निर्यातबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कांद्याचे दर कोसळले. अनेकदा मागणी करूनही सरसकट निर्यादबंदी हटवली गेली नाही. शिवाय तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करत कांदा विक्री करावी लागत आहे. असे असताना देखील केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी परिपत्रक काढले असून यानुसार दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात केला जाणार आहे.

गुजरात राज्यातील मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि नाव्हाशेव्हा- जेएनपीटी पोर्टवरून निर्यात परदेशात केली जाणार आहे. विशेष म्हणजे एनसीएलच्या माध्यमातून निर्यात न करता थेट निर्यातदारांच्या माध्यमातून ही निर्यात केली जाणार आहे. एकीकडे लाल आणि उन्हाळ कांदा कवडीमोल भावात विकला जात असताना केंद्र सरकारच्या विभागाने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची असलेली निर्यात खुली करण्याच्या मागणीवर शासन अद्यापही उदासीन आहे. दुसरीकडे अचानकपणे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाचे हे धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत नेणारा असल्याची टीका शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :onionकांदा