शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

रस्त्यावरील धुळीने शेतकऱ्यांचे हाल पे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:36 IST

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव : शिर्डी-सुरत महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी चौफुली, मुखेड फाटा आणि अंतरवेली फाटा या ठिकाणी सतत अपघात घडतात. या ठिकाणच्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे अपघाताबरोबर शेतमालाचेही नुकसान होत आहे. सततच्या उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देवी मंदिर परिसरातील वस्तीलगत भूमिगत नाल्यासाठी ५ फुटाच्या अधिक खोल नाली गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खोदून ठेवल्या आहेत. गटारीत डासांची उत्पत्ती वाढली असून, डेंग्यूसारखे साथरोग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे व नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. (०२ पिंपळगाव २)............................................................................द्राक्ष उत्पादक हवालदिल....परिसरात रस्त्याचे व गटार नालीचे काम अपूर्ण असल्यामुळे धुळीचे व घाणीचे साम्राज्य वाढले आहे. परिसरातील द्राक्षबागांवर उडणाऱ्या मातीचा धर बसला आहे. त्यामुळे द्राक्ष पिकांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.गटाराची नाली ठरतेय जीवघेणीवस्तीलगत असलेले गटारबांधणीसाठी अतिक्रमण काढून तीन महिने झाले. पावसात सांडपाण्याचा त्रास नागरिकांनी सहन केला, मात्र आता त्याच सांडपाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराला आमंत्रण मिळत आहे.नालीसाठी आणलेले पाइपदेखील ठेकेदार परत घेऊन जात असल्याने नागरिकांना कडून नाराजी व्यक्त केली जात आहे .कासव गतीच्या कामामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराने थैमान घातले आहे. शहरातून गेलेल्या रस्त्याचे काम जलद गतीने करावे, अन्यथा जनआंदोलन छेडून रस्ता रोको केला जाईल. प्रशासनाचा निषेध नोंदविला जाईल.दत्तू झनकर, उलगुलान सेनाकोरोनामुळे रस्ताचे काम रखडले होते, आता काम सुरू झाले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल.-माणिक गाडे, रस्ते इंजिनिअर, शिर्डी-सुरत मार्ग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDust stormधुळीचे वादळ