शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 5:50 PM

पाटोदा : विहिरी तसेच बोअरवेलला मुबलक पाणी असूनही केवळ वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे दिवसा खंडित तसेच अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून व रात्रीचा दिवस करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देजीव धोक्यात : खंडित, अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा परिणाम

यावर्षी खरीप हंगामात परतीच्या अवकाळी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, तसेच पोळ कांदा व कांदा रोप सडून खराब झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. केलेला खर्चही वसूल न झाल्याने खरिपाची तूट भरून काढण्यासाठी शेतकरी वर्गाने महागडे कांदा बियाणे उपलब्ध करीत कांदा रोप तयार केले व मोठ्या प्रमाणात रांगडा कांदा तसेच उन्हाळ कांद्याची लागवड केली. गहू हरभरा पिकाची पेरणी केली. पिकेही चांगली आहेत; मात्र पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीचा जागता पहारा द्यावा लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोअरवेल तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी वर्गाने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. आजमितीस पिकांना पाणी देणे गरजेचे आहे; परंतु दिवसभर वारंवार खंडित होणारा अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे जागरण करीत पिकांना पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वीजपंप जळण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती